शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार

By admin | Updated: January 4, 2016 01:09 IST

नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी

आळंदी : नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आळंदीत केली.ज्ञानेश्वरी लेखणीच्या ७२५व्या वर्षानिमित्त आळंदी येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. वारकरी म्हणजे देशाची सज्जन शक्ती. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनी तब्बल सव्वासातशे वर्षे जोपासली. त्यातील भक्तिभाव व आध्यात्मिक भावना जोपासली, हेच आमचे वैभव आहे. आज आम्ही वैश्विकीकरणाकडे जात आहोत, जग जवळ येत आहे. मात्र संत ज्ञानेश्वरांना हे तेव्हाच समजले होते. वैश्विकीकरणाचा पहिला संदेश त्यांनी जगाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिला, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माऊलींची प्रतिमा व ज्ञानेश्वरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दि. २७ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या सोहळ्याची सांगता रामायणाचार्य रामराव ढोकमहाराज यांच्या कीर्तनाने व उपस्थित भाविकांना महाप्रसादवाटपाने करण्यात आली. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, नेवाशाचे आमदार भानुदास मुरकुटे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, रमेश गोगावले, अ. भा. वारकरी मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)