शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार

By admin | Updated: January 4, 2016 01:09 IST

नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी

आळंदी : नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आळंदीत केली.ज्ञानेश्वरी लेखणीच्या ७२५व्या वर्षानिमित्त आळंदी येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. वारकरी म्हणजे देशाची सज्जन शक्ती. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनी तब्बल सव्वासातशे वर्षे जोपासली. त्यातील भक्तिभाव व आध्यात्मिक भावना जोपासली, हेच आमचे वैभव आहे. आज आम्ही वैश्विकीकरणाकडे जात आहोत, जग जवळ येत आहे. मात्र संत ज्ञानेश्वरांना हे तेव्हाच समजले होते. वैश्विकीकरणाचा पहिला संदेश त्यांनी जगाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिला, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माऊलींची प्रतिमा व ज्ञानेश्वरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दि. २७ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या सोहळ्याची सांगता रामायणाचार्य रामराव ढोकमहाराज यांच्या कीर्तनाने व उपस्थित भाविकांना महाप्रसादवाटपाने करण्यात आली. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, नेवाशाचे आमदार भानुदास मुरकुटे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, रमेश गोगावले, अ. भा. वारकरी मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)