शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार

By admin | Updated: January 4, 2016 01:09 IST

नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी

आळंदी : नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आळंदीत केली.ज्ञानेश्वरी लेखणीच्या ७२५व्या वर्षानिमित्त आळंदी येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. वारकरी म्हणजे देशाची सज्जन शक्ती. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनी तब्बल सव्वासातशे वर्षे जोपासली. त्यातील भक्तिभाव व आध्यात्मिक भावना जोपासली, हेच आमचे वैभव आहे. आज आम्ही वैश्विकीकरणाकडे जात आहोत, जग जवळ येत आहे. मात्र संत ज्ञानेश्वरांना हे तेव्हाच समजले होते. वैश्विकीकरणाचा पहिला संदेश त्यांनी जगाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिला, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माऊलींची प्रतिमा व ज्ञानेश्वरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दि. २७ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या सोहळ्याची सांगता रामायणाचार्य रामराव ढोकमहाराज यांच्या कीर्तनाने व उपस्थित भाविकांना महाप्रसादवाटपाने करण्यात आली. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, नेवाशाचे आमदार भानुदास मुरकुटे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, रमेश गोगावले, अ. भा. वारकरी मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)