शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वडाची वाडीत वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची समस्या तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

वडाची वाडीत वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची समस्या तीव्र ........................................ महिलांची हंडाभर पाण्यासाठी वणवण; महापालिकेला घालणार साकडे ........................................ दीपक मुनोत / ...

वडाची वाडीत वाढत्या उन्हाबरोबर पाण्याची समस्या तीव्र

........................................

महिलांची हंडाभर पाण्यासाठी वणवण; महापालिकेला घालणार साकडे

........................................

दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहराच्या परिघावरील वडाची वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असुन वाढत्या उन्हाबरोबर दाहकता वाढत चालली आहे.

आजूबाजूला वेगाने वाढत असलेले नागरिकरण आणि त्या तुलनेत सुविधांचा अभाव, यामुळे विलिनीकरणाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

गावात सर्वात महत्त्वाचा आणि जाचक प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा आहे. गावासाठी महापालिकेची लाईन नसल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दोन विहीरी आणि ''वडाची वाडी पाझर तलाव'' आहेत. परंतु आता गावातील वाढते नागरिकरण पाहता हे पाणी अपूरे पडत आहे. जे तुरळक पाणी मिळते तेही अशुद्ध आणि महागडे असून आता आम्हाला महापालिकेने पाणी उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

गावात ७० % भागात भूमिगत गटारचे काम झालेले असून औताडेवाडीजवळील परिसर आणि काही प्लॉटिंगच्या भागातील उर्वरित काम जलदगतीने सुरु आहे. सांडपाण्याची व्यवस्था ही महापालिकेच्या लाईनला जोडली असल्याने ग्रामस्थांना सांडपाण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे.

गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे. ३/४ छोट्या मोठ्या टेम्पोमार्फत हा कचरा मंतरवाडी कचरा डेपोत टाकला जातो आहे. गावाला मोठे गायरान असूनही आमच्या गावात कचरा डेपो का नाही, असा प्रश्न गावकरी विचारतात.

गावातील मुख्य रस्त्याचे काम स्थानिक आमदार निधीतून सुरू आहे. त्याचबरोबर गावातील इतर अंतर्गत रस्त्यांची कामेही झालेली आहे. मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) निधी मिळाला नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली.

अन्य गावांना ही मदत मिळत असताना आम्हाला वंचित ठेवल्याने अन्य पायाभुत सुविधांना खीळ बसली, अशी तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी करतात.

____________________________________

*कोट*

कोरोनाकाळात ग्रामपंचायतील अपेक्षित निधी मिळाला नाही. यापुढे तरी भेदभाव नको. महापालिका पायाभूत सुविधांची व्यवस्था करत असेल तर आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.

-कांचन बांदल

सरपंच

____________________________________

याआधी जी अकरा गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात आली त्यांचा पायाभूत सुविधांचा विकास झाला का? तर नाही, मग आमच्या गावाचा समावेश करुन फक्त राजकीय उद्देश साधला जाईल.

-रोहीत जाधव, युवक

_________________________

फोटो ओळ :

गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.