शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

इंदापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 8, 2015 05:16 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या

इंदापूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना देवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे हीच मागणी करून पाच दिवस उलटून गेले. तरी देखील काही ही उपयोग न झाल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेचे प्रशासन हतबल झाले आहे.त्वरित उपाय न झाल्यास लोकांचा असंतोष भडकेल, असे चित्र दिसत आहे. मार्च २०१५ मध्ये तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्यानंतर, खडकवासला कालव्याद्वारे तलावात दोन तीन दिवस पाणी सोडण्यात आले. पाण्याची पातळी चार फुटाने वाढली. तत्पूर्वी १८ मार्चपासून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येवू लागला. पाण्याचा वापर व बाष्पीभवन यामुळे पाण्याची पातळी खालावली. या घडामोडी होवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. मात्र कालव्याचे पाणी तलावापर्यंत पोहोचले नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे,पाणी टंचाई उग्र रूप घेवू लागली आहे. दिवसाआड अपूरा पाणी पुरवठा होत असल्याने लोकभावना भडकत आहे. राजकीय मंडळीची बेपर्वाई, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ धोरणाचे खापर नगरपरिषदेच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसत आहे.