शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

इंदापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 8, 2015 05:16 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या

इंदापूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना देवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे हीच मागणी करून पाच दिवस उलटून गेले. तरी देखील काही ही उपयोग न झाल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेचे प्रशासन हतबल झाले आहे.त्वरित उपाय न झाल्यास लोकांचा असंतोष भडकेल, असे चित्र दिसत आहे. मार्च २०१५ मध्ये तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्यानंतर, खडकवासला कालव्याद्वारे तलावात दोन तीन दिवस पाणी सोडण्यात आले. पाण्याची पातळी चार फुटाने वाढली. तत्पूर्वी १८ मार्चपासून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येवू लागला. पाण्याचा वापर व बाष्पीभवन यामुळे पाण्याची पातळी खालावली. या घडामोडी होवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. मात्र कालव्याचे पाणी तलावापर्यंत पोहोचले नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे,पाणी टंचाई उग्र रूप घेवू लागली आहे. दिवसाआड अपूरा पाणी पुरवठा होत असल्याने लोकभावना भडकत आहे. राजकीय मंडळीची बेपर्वाई, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ धोरणाचे खापर नगरपरिषदेच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसत आहे.