शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

पाणी नियोजन कोलमडले

By admin | Updated: May 3, 2017 02:36 IST

पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात

पिंपरी : पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी महिलावर्ग आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात ३७ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच दिवशी २६ टक्के पाणीसाठा होता. वाढलेली लोकसंख्या व पाणीउपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पाऊस होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे, त्यामुळे महापौरांनी गटनेते, पक्षनेते आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाणी कपातीचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यापैकी मंगळवारी एका विभागात पाणीपुरवठा करण्यात आला. उद्या दुसऱ्या विभागात पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियमितपणे होणाऱ्या पाण्यात २५ टक्के कपात करण्यात येत आहे. चिंचवड, निगडी, सांगवीच्या काही भागांत नियोजित वेळेत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. (प्रतिनिधी)पाऊस लांबल्यास कपात वाढविणारपाऊस येण्यास उशीर झाला, तर आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.प्रबोधनाकडे केले दुर्लक्षपाणीपुरवठा विभागाने महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती प्रभाग स्तरांवरून नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत दवंडी पीटविणे किंवा पत्रकाद्वारे माहिती देणे गरजेचे होते. पहिल्याच दिवशी वेळापत्रक शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना न कळाल्याने तारांबळ उडाली होती. ‘‘बिले न भरणाऱ्यांवर नळजोड तोडण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग करते, यासाठी प्रबोधन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पाणी कपातीची माहिती मिळाली नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली.