शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नियोजन कोलमडले

By admin | Updated: May 3, 2017 02:36 IST

पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात

पिंपरी : पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी महिलावर्ग आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात ३७ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच दिवशी २६ टक्के पाणीसाठा होता. वाढलेली लोकसंख्या व पाणीउपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पाऊस होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे, त्यामुळे महापौरांनी गटनेते, पक्षनेते आणि प्रशासनाची बैठक घेऊन पाणी कपातीचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यापैकी मंगळवारी एका विभागात पाणीपुरवठा करण्यात आला. उद्या दुसऱ्या विभागात पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नियमितपणे होणाऱ्या पाण्यात २५ टक्के कपात करण्यात येत आहे. चिंचवड, निगडी, सांगवीच्या काही भागांत नियोजित वेळेत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. (प्रतिनिधी)पाऊस लांबल्यास कपात वाढविणारपाऊस येण्यास उशीर झाला, तर आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.प्रबोधनाकडे केले दुर्लक्षपाणीपुरवठा विभागाने महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. याबाबतची माहिती प्रभाग स्तरांवरून नागरिकांना देणे गरजेचे होते. याबाबत दवंडी पीटविणे किंवा पत्रकाद्वारे माहिती देणे गरजेचे होते. पहिल्याच दिवशी वेळापत्रक शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना न कळाल्याने तारांबळ उडाली होती. ‘‘बिले न भरणाऱ्यांवर नळजोड तोडण्याची कारवाई पाणीपुरवठा विभाग करते, यासाठी प्रबोधन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पाणी कपातीची माहिती मिळाली नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली.