शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट

By admin | Updated: March 12, 2016 01:37 IST

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाणवठे आटू

कांताराम भवारी, डिंभेवाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाणवठे आटू लागल्याने दरवर्षी शिमग्यात भासणारी पाणीटंचाई यंदा महिनाभर आधीच जाणवू लागली आहे. धरण पाणलोटक्षेत्रात तर खोल-खोल गेलेले पाणी महिलांना डोक्यावर वाहून आणावे लागत असल्याने दमछाक होत आहे. डोंगरदऱ्यांतील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने रणरणत्या उन्हात डोक्यावर हांडे घेऊन पायाखालचा फुफाटा तुडवत घोटभर पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट सुरू झाली आहे. डोंगरमाथ्यावरील आहुपे खोऱ्यातील कोंढरे, न्हावेड, नाणवडे, आघाणे, तिरपाड, पिंपरगणे, डोणी, कापरवाडी, भोईरवाडी तर बोरघरच्या उंबरवाडी, काळवाडी या डोंगर माथ्यावरील आदिवासी वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाणवठे आटू लागले असून, धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीही झपाट्याने कमी होऊ लागले आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचेही हाल होऊ लागले आहेत. आधीच चाराटंचाई त्यात पिण्याच्या पाण्याचेही हाल होऊ लागल्याने यंदा पाळीव जनावरेही सांभाळताना आदिवासी शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. एकंदरीतच पावसाने या भागातून लवकर घेतलेला काढता पाय, स्थानिक पाणवठे आटल्याने निर्माण होऊ लागलेली पाणीटंचाई, तर डिंभे धरणातील दिवसेंदिवस घटत जाणारी पाणीपातळी यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदाचा उन्हाळा अधिकच कडक जाणार यात शंका नाही.> महिनाभर आधीच स्रोत आटू लागल्याचे चित्रआंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागात यंदा पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. यंदा पावसाने या भागातून लवकरच काढता पाया घेतल्याने दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांजवळील पाण्याचे नैसर्गिक स्रोेत यंदा महिनाभर आधीच आटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. > विहिरींनी तळ गाठलेगावांच्या आसपास बांधण्यात आलेली तळी आटू लागली असून, शिल्लक राहिलेले पाणी दूषित होऊ लागले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. डिंभे धरणाच्या आत घोडनदीवर बांधण्यात आलेले बंधारे तर कोरडे ठणठणीत पडले आहेत. अडिवरे व कोकणेवाडी तसेच फुलवडे येथील बंधाऱ्यात जेमतेम पाणी आहे तेही दूषित होऊ लागल्याचे चित्र आहे.