शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट

By admin | Updated: March 12, 2016 01:37 IST

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाणवठे आटू

कांताराम भवारी, डिंभेवाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील पाणवठे आटू लागल्याने दरवर्षी शिमग्यात भासणारी पाणीटंचाई यंदा महिनाभर आधीच जाणवू लागली आहे. धरण पाणलोटक्षेत्रात तर खोल-खोल गेलेले पाणी महिलांना डोक्यावर वाहून आणावे लागत असल्याने दमछाक होत आहे. डोंगरदऱ्यांतील पाण्याचे स्रोत आटू लागल्याने रणरणत्या उन्हात डोक्यावर हांडे घेऊन पायाखालचा फुफाटा तुडवत घोटभर पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट सुरू झाली आहे. डोंगरमाथ्यावरील आहुपे खोऱ्यातील कोंढरे, न्हावेड, नाणवडे, आघाणे, तिरपाड, पिंपरगणे, डोणी, कापरवाडी, भोईरवाडी तर बोरघरच्या उंबरवाडी, काळवाडी या डोंगर माथ्यावरील आदिवासी वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाणवठे आटू लागले असून, धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीही झपाट्याने कमी होऊ लागले आहे. माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचेही हाल होऊ लागले आहेत. आधीच चाराटंचाई त्यात पिण्याच्या पाण्याचेही हाल होऊ लागल्याने यंदा पाळीव जनावरेही सांभाळताना आदिवासी शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. एकंदरीतच पावसाने या भागातून लवकर घेतलेला काढता पाय, स्थानिक पाणवठे आटल्याने निर्माण होऊ लागलेली पाणीटंचाई, तर डिंभे धरणातील दिवसेंदिवस घटत जाणारी पाणीपातळी यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदाचा उन्हाळा अधिकच कडक जाणार यात शंका नाही.> महिनाभर आधीच स्रोत आटू लागल्याचे चित्रआंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागात यंदा पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. यंदा पावसाने या भागातून लवकरच काढता पाया घेतल्याने दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांजवळील पाण्याचे नैसर्गिक स्रोेत यंदा महिनाभर आधीच आटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. > विहिरींनी तळ गाठलेगावांच्या आसपास बांधण्यात आलेली तळी आटू लागली असून, शिल्लक राहिलेले पाणी दूषित होऊ लागले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. डिंभे धरणाच्या आत घोडनदीवर बांधण्यात आलेले बंधारे तर कोरडे ठणठणीत पडले आहेत. अडिवरे व कोकणेवाडी तसेच फुलवडे येथील बंधाऱ्यात जेमतेम पाणी आहे तेही दूषित होऊ लागल्याचे चित्र आहे.