शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी हमारा जीवन हैै, इसे क्यंू अपने हातों से खत्म करे!

By admin | Updated: December 30, 2016 04:27 IST

नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा

बारामती : नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा बेसुमार उपसा यांमुळे फटका बसू लागला आहे. यावर बारामती येथे भरलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये उत्तराखंड राज्यातील स्मृती पांडे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलीने संशोधनपर अहवाल सादर केला. पाणीबचतीचे आवाहन करताना ‘पाणी हमारा जीवन हैै, तो हम क्यूं अपने हातों से अपनाही जीवन खत्म कर रहे हैै’ असे आवाहनही स्मृती करते. स्मृतीच्या या संशोधन अहवालाचे सर्वांनीच कौतुक केले. तसेच पाणीबचतीचे महत्त्व ही काळाची गरज असल्याची जाणीवही या निमित्ताने साऱ्यांना झाली. भूजलाच्या अतिरिक्त उपशामुळे मागील उन्हाळ्यात नैनीताल सरोवराची पाणीपातळी प्रचंड खालावली. वजा पाच फुटांपर्यंत पाणीपातळी खालावल्याने येथील निसर्गतज्ज्ञ, पर्यावरणवादी यांच्यातून चिंता व्यक्त होऊ लागली. नेमका हाच विषय डोळ्यांसमोर ठेवत स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिच्या शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले. नैनीताल शहरामध्ये दररोज १.५ मिलियन भूजलाचा उपसा होत आहे. या अतिरिक्त भूजल उपशामुळे नैनीताल सरोवराची पाणीपातळी घटत असल्याचेही समोर आले. तसेच पृथ्वीचे वाढते तापमान, कमी झालेला पाऊसकाळ यामुळे भूजलपातळीही प्रचंड प्रमाणात खालावत आहे. याचा परिणाम म्हणून दरवर्षी मे महिन्यामध्ये साधारण पाणीपातळीपेक्षा १२ फुटाने सरोवराची पाणीपातळी खालावते. मात्र, मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ही पातळी १७ फुटाने खालावली. म्हणजेच वजा ५ फुटाने पाणीपातळी खालावल्याचा निष्कर्ष स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी काढला. केवळ अहवाल तयार करण्यापुरतेच ही बच्चेकंपनी थांबली नाही, तर त्यांनी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ अबाधीत राहावे, त्याचे सौंदर्य चिरकाळ टिकावे यासाठी ‘पाणी बचाव लोकअभियान’ सुरू केले. पर्यावरणासंबंधी संवेदनशीलपणे विचार करणाऱ्यांना जमवून पाणीबचतीचे संदेश देण्यासाठी हे बालवैज्ञानिक सरसावले आहेत. उत्तराखंड राज्यातून १६ बालवैज्ञानिकांसह राज्य पथकप्रमुख कमला पंत, प्रभारी निर्मल रावत, शिक्षक हिमांशू पांडे, डॉ. बी. सी. पांडे, एस. एस. मेहरा, मंजुला पांडे आदी बारामती येथील राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेला उपस्थित राहिले आहेत.- स्मृती सांगते की, आम्ही पाणी वापरासबंधी समाजाचा आर्थिक स्तर तपासला. यामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले. ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे अशा व्यक्तींकडे पाण्याचे स्रोत आहेत. यामध्ये प्रमुख्याने बोअरवेलचा समावेश आहे. या व्यक्ती दिवसाला १ हजार ५०० लिटर पाणी वाया घालवतात, तर आर्थिक स्तर कमी असणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांच्याकडे पाण्याचे स्वमालकीचे स्रोत नाहीत अशांना दिवसाला फक्त १५० ते २०० लिटरच पाणी पुरते. हे चित्र थांबायाला हवे. पाण्याचा पूनर्वापर होणे गरजेचे आहे, असेही यावेळी स्मृती पांडे हिने सांगितले.