शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणी हमारा जीवन हैै, इसे क्यंू अपने हातों से खत्म करे!

By admin | Updated: December 30, 2016 04:27 IST

नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा

बारामती : नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा बेसुमार उपसा यांमुळे फटका बसू लागला आहे. यावर बारामती येथे भरलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये उत्तराखंड राज्यातील स्मृती पांडे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलीने संशोधनपर अहवाल सादर केला. पाणीबचतीचे आवाहन करताना ‘पाणी हमारा जीवन हैै, तो हम क्यूं अपने हातों से अपनाही जीवन खत्म कर रहे हैै’ असे आवाहनही स्मृती करते. स्मृतीच्या या संशोधन अहवालाचे सर्वांनीच कौतुक केले. तसेच पाणीबचतीचे महत्त्व ही काळाची गरज असल्याची जाणीवही या निमित्ताने साऱ्यांना झाली. भूजलाच्या अतिरिक्त उपशामुळे मागील उन्हाळ्यात नैनीताल सरोवराची पाणीपातळी प्रचंड खालावली. वजा पाच फुटांपर्यंत पाणीपातळी खालावल्याने येथील निसर्गतज्ज्ञ, पर्यावरणवादी यांच्यातून चिंता व्यक्त होऊ लागली. नेमका हाच विषय डोळ्यांसमोर ठेवत स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिच्या शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले. नैनीताल शहरामध्ये दररोज १.५ मिलियन भूजलाचा उपसा होत आहे. या अतिरिक्त भूजल उपशामुळे नैनीताल सरोवराची पाणीपातळी घटत असल्याचेही समोर आले. तसेच पृथ्वीचे वाढते तापमान, कमी झालेला पाऊसकाळ यामुळे भूजलपातळीही प्रचंड प्रमाणात खालावत आहे. याचा परिणाम म्हणून दरवर्षी मे महिन्यामध्ये साधारण पाणीपातळीपेक्षा १२ फुटाने सरोवराची पाणीपातळी खालावते. मात्र, मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ही पातळी १७ फुटाने खालावली. म्हणजेच वजा ५ फुटाने पाणीपातळी खालावल्याचा निष्कर्ष स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी काढला. केवळ अहवाल तयार करण्यापुरतेच ही बच्चेकंपनी थांबली नाही, तर त्यांनी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ अबाधीत राहावे, त्याचे सौंदर्य चिरकाळ टिकावे यासाठी ‘पाणी बचाव लोकअभियान’ सुरू केले. पर्यावरणासंबंधी संवेदनशीलपणे विचार करणाऱ्यांना जमवून पाणीबचतीचे संदेश देण्यासाठी हे बालवैज्ञानिक सरसावले आहेत. उत्तराखंड राज्यातून १६ बालवैज्ञानिकांसह राज्य पथकप्रमुख कमला पंत, प्रभारी निर्मल रावत, शिक्षक हिमांशू पांडे, डॉ. बी. सी. पांडे, एस. एस. मेहरा, मंजुला पांडे आदी बारामती येथील राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेला उपस्थित राहिले आहेत.- स्मृती सांगते की, आम्ही पाणी वापरासबंधी समाजाचा आर्थिक स्तर तपासला. यामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले. ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे अशा व्यक्तींकडे पाण्याचे स्रोत आहेत. यामध्ये प्रमुख्याने बोअरवेलचा समावेश आहे. या व्यक्ती दिवसाला १ हजार ५०० लिटर पाणी वाया घालवतात, तर आर्थिक स्तर कमी असणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांच्याकडे पाण्याचे स्वमालकीचे स्रोत नाहीत अशांना दिवसाला फक्त १५० ते २०० लिटरच पाणी पुरते. हे चित्र थांबायाला हवे. पाण्याचा पूनर्वापर होणे गरजेचे आहे, असेही यावेळी स्मृती पांडे हिने सांगितले.