शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

‘नाझरे’चे पाणी पळविले

By admin | Updated: September 25, 2014 06:18 IST

आज या कालव्यातून आवर्तनाव्यतिरिक्त दररोज ४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

जेजुरी : येथील नाझरे जलाशय भरला असून, नीरा पाटबंधारे विभागाच्या कृपेने जलाशयातील पाणी नदीतून जाण्याऐवजी कालव्याद्वारे बारामती तालुक्यातील पाझर तलाव, नाला बंडिंग भरून घेतले जात आहेत. यामुळे स्थानिक शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. आज या कालव्यातून आवर्तनाव्यतिरिक्त दररोज ४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून कऱ्हा नदीतून येणारे पाणी जलाशय भरल्यानंतर नदीपात्रातून बारामती तालुक्यात पोहोचते. यामुळे नदीकाठच्या गावांना याचा मोठा फायदा होतो. या वर्षी गेल्या १५ सप्टेंबरला जलाशय भरला, तरीही जलाशयाच्या खाली नदीपात्रात पाणी आलेच नाही. जलाशय भरूनही पाणी का नाही, याची माहिती घेतली असता नीरा पाटबंधारे विभागाचा हा अजब प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शिवाय, या संदर्भात माहिती घेतली असता कर्मचारी व अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीचीच उत्तरे दिली. नाझरे जलाशय शाखाधिकारी शहाजी सस्ते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नीरा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दिगंबर दुबल यांच्याशी संपर्क साधून माहिती घ्या, असेच उत्तर दिले आहे. तर, दुबल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जलाशयातून कालव्याद्वारे वर्षातील चार वेळच्या आवर्तनाव्यतिरिक्त पाणी सोडणे गैर असून, राजरोसपणे ही पाण्याची चोरीच होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. कालव्यातून होणारी पाण्याची चोरी दोन दिवसांत बंद न झाल्यास जनआंदोलन करून ते बंद करावे लागेल, असे नाझरे क.प.चे उपसरपंच संदीप चिकणे यांनी म्हटले आहे.नाझरे जलाशय पुरंदर तालुक्यात आहे, त्याचा फायदा पुरंदरला नाहीच. आम्हाला पुरंदर उपसासारख्या योजनेतून विकत पाणी आणि बारामतीला फुकट पाणी, हा दुजाभाव असून हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नाझरे क.प.चे उपसरपंच संदीप चिकणे यांनी व्यक्त केली आहे. पुरंदर उपसातून पुरंदरमधील पाझर तलाव भरण्यासाठी आम्हाला पैसे मोजावे लागतात आणि बारामती तालुक्यातील पाझर तलाव फुकटात•भरले जातात, हा कोणता न्याय? कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, आता तो खपवून घेतला जाणार नाही. तसेच, गेल्या दहा दिवसांत कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी त्वरित बंद करावे व सोडण्यात आलेल्या पाण्याचे बिल पाटबंधारे विभागाच्या आधिकाऱ्यांकडून वसूल करावे, अशी मागणी चिकणे, नाझरे क.प.चे माजी उपसरपंच संतोष नाझिरकर, रोहिदास खैरे, जालिंदर वायसे, मधुकर गाढवे, जवळार्जुनचे सरपंच अप्पासाहेब राणे, मावडी क.प.चे सरपंच अनिल भामे तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना•भटणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.