शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वेल्हेच्या तोंडचे पाणी ‘तोडले’

By admin | Updated: September 14, 2015 04:36 IST

एकीकडे पाण्यासाठी ओरड सुरू असताना डोळ्यांसमोर दिसत असतानाही वेल्हे ग्रामस्थांवर ‘पाणी पाणी’ करण्याची वेळ आली आहे

पुणे : एकीकडे पाण्यासाठी ओरड सुरू असताना डोळ्यांसमोर दिसत असतानाही वेल्हे ग्रामस्थांवर ‘पाणी पाणी’ करण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या एका अध्यादेशाचा चुकीचा अर्थ लावून या गावची मंजूर पाणी योजना थांबवली आहे. विशेष म्हणजे ५४,११,९९३ रुपयांचा पहिला हप्ताही डिसेंबरमध्ये ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग झालेला आहे. पण जिल्हा परिषद आता हा निधी परत करा म्हणून मागे लागली आहे.वर्षभरापूर्वी शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यात नगरपंचायती करण्याची प्राथमिक उद्घोषणा केली. त्यात वेल्हे ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. मात्र अद्याप त्या झाल्या नाहीत. दरम्यानच्या काळात वेल्हे ग्रामपंचायतीसाठी २0१४ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचा ५४,११,९९३ रुपयांचा पहिला हप्ताही डिसेंबर २0१४ मध्ये ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे ग्रामपंचायतीला पत्र पाठवून ही योजनाच रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. मुळात शासनाने काढलेल्या अध्यादेशाचा जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीचा अर्थ लावला आहे. यात ‘नागरी क्षेत्र घोषित’ करण्यात आलेल्या असा उल्लेख आहे. मात्र वेल्हेत नगरपंचायत ही फक्त शासनाची उद्घोषणाच आहे. मुळात जर ती घोषणा असती तर आता तेथे ग्रामपंचायत निवडणुकाही झाल्या नसत्या.ही बाब यापूर्वीही ‘लोकमत’ने मांडली आहे. तसेच सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनीही हा प्रश्न प्रशासनाला विचारला होता. त्याचप्रमाणे ग्रामसभेत ठराव करून ग्रामस्थांनी तसे पत्रं जलसंपदामंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेला दिली आहेत. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, ग्रामस्थांना दाद मिळत नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेतही वेल्हे पंचायत समितीच्या सभापती सविता वडघरे यांनी हा प्रश्न विचारला; मात्र त्यांना करू, पाहू असे सांगून प्रशासन चालढकल करीत आहे. माजी उपसरपंच दत्तात्रय देशमाने यांनी हे गाऱ्हाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्याकडेही सहा महिन्यांपूर्वी मांडले होते. उमाप यांनी, चौकशी करून दोन दिवसांत कळविता असे सांगितले. मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. आता येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. जिल्हा परिषदेने लवकरात लवकर पाणी योजना चालू करण्याचे पत्र द्यावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वकारावा लागेल असे माजी सरपंच संतोष मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)