शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून १ जूनपासून पाणी परवाने

By admin | Updated: May 26, 2017 05:45 IST

उजनी जलाशयातून येत्या एक जूनपासून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने देणे आणि त्यांचे नूतनीकरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : उजनी जलाशयातून येत्या एक जूनपासून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने देणे आणि त्यांचे नूतनीकरण सुरू होणार असल्याची माहिती भीमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.१९९५मध्ये दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयातून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने काढून आपली कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणली. या पाणी परवानगीची १८ वर्षांची मुदत २०१३मध्ये संपली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी या विभागाकडे हे पाणी परवाने नूतनीकरणासाठी मागणी केलेली आहे. परंतु, दीड-दोन वर्षांपासून नवीन पाणी परवाने आणि नूतनीकरणाचे काम बंद आहे. भीमानगर उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी सांगितले, की दीड-दोन वर्षांपासून नव्हे, तर दीड-दोन महिन्यांपासून पाणी परवानगी नूतनीकरण बंद होते. ते १ जूनपासून सुरू होईल. जलाशयातील पाण्याचा जो आपल्याला अपेक्षित वापर दिलेला आहे त्यापेक्षा जास्त वापर होता. अपेक्षित ९.६ टीएमसी असणारा वापर १२ टीएमसीपर्यंत गेलेला होता. त्यामुळे पाणीवापरावर नियंत्रण आणण्यास सगळ्यांना सांगितले होते.दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर, पेडगाव, वडगाव दरेकर, देऊळगावराजे आणि आलेगाव या ११ गावांतील शेतकऱ्यांना उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यावर शेती सिंचनाखाली आणलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना हे पाणी उचलण्यासाठी उजनी धरणाच्या पाणी परवानगी काढाव्या लागतात. या परवानग्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. दौंड आणि भिगवण या शाखांतून अनेक शेतकऱ्यांनी दीड-दोन वर्षंापासून प्रकरणे पाठविण्यात आली आहेत; परंतु प्रकरणाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ही प्रकरणे उजनी पाणी व्यवस्थापन, भीमानगर येथे पडून आहेत. त्या ठिकाणी पाणी परवानगीची चौकशी केली, तर तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळतात. दौंड आणि भिगवण शाखा कार्यालयात याबाबत विचारले असता ‘भीमानगरला चौकशी करा,’ असे सांगितले जाते. जर शेतकऱ्यांना पाणी परवानगी देण्याचे बंद केले असेल, तर ही प्रकरणे जमा का करून घेतली? पैसे भरून का घेतले? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.