शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

उजनीतून १ जूनपासून पाणी परवाने

By admin | Updated: May 26, 2017 05:45 IST

उजनी जलाशयातून येत्या एक जूनपासून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने देणे आणि त्यांचे नूतनीकरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : उजनी जलाशयातून येत्या एक जूनपासून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने देणे आणि त्यांचे नूतनीकरण सुरू होणार असल्याची माहिती भीमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.१९९५मध्ये दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयातून उपसा सिंचन करण्यासाठी पाणी परवाने काढून आपली कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणली. या पाणी परवानगीची १८ वर्षांची मुदत २०१३मध्ये संपली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी या विभागाकडे हे पाणी परवाने नूतनीकरणासाठी मागणी केलेली आहे. परंतु, दीड-दोन वर्षांपासून नवीन पाणी परवाने आणि नूतनीकरणाचे काम बंद आहे. भीमानगर उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सोनेवार यांनी सांगितले, की दीड-दोन वर्षांपासून नव्हे, तर दीड-दोन महिन्यांपासून पाणी परवानगी नूतनीकरण बंद होते. ते १ जूनपासून सुरू होईल. जलाशयातील पाण्याचा जो आपल्याला अपेक्षित वापर दिलेला आहे त्यापेक्षा जास्त वापर होता. अपेक्षित ९.६ टीएमसी असणारा वापर १२ टीएमसीपर्यंत गेलेला होता. त्यामुळे पाणीवापरावर नियंत्रण आणण्यास सगळ्यांना सांगितले होते.दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्डी, शिरापूर, पेडगाव, वडगाव दरेकर, देऊळगावराजे आणि आलेगाव या ११ गावांतील शेतकऱ्यांना उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या पाण्यावर शेती सिंचनाखाली आणलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना हे पाणी उचलण्यासाठी उजनी धरणाच्या पाणी परवानगी काढाव्या लागतात. या परवानग्या काढण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. दौंड आणि भिगवण या शाखांतून अनेक शेतकऱ्यांनी दीड-दोन वर्षंापासून प्रकरणे पाठविण्यात आली आहेत; परंतु प्रकरणाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ही प्रकरणे उजनी पाणी व्यवस्थापन, भीमानगर येथे पडून आहेत. त्या ठिकाणी पाणी परवानगीची चौकशी केली, तर तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळतात. दौंड आणि भिगवण शाखा कार्यालयात याबाबत विचारले असता ‘भीमानगरला चौकशी करा,’ असे सांगितले जाते. जर शेतकऱ्यांना पाणी परवानगी देण्याचे बंद केले असेल, तर ही प्रकरणे जमा का करून घेतली? पैसे भरून का घेतले? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.