शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

बंदोबस्तात उजनीला सोडले पाणी

By admin | Updated: January 14, 2016 03:52 IST

जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोन धरणातून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने

पुणे : जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोन धरणातून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नुकताच दिला होता. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात बुधवारपासून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. चासकमान धरणातून सकाळी दहा वाजता चार दरवाज्यांद्वारे तीन हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात तर भामा-आसखेड धरणातून १,००० क्युसेक्सने पाणी सोडले आहे.पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान, मुळशी, कासारसाई, आंध्रा व वडीवळे या धरणांमधून सोलापूरसाठी उजनी धरणात २९१.८१ दलघमी म्हणजे १०.३0 टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने दिला होता. याला स्थगित देत फशरनिर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार भामा आसखेड धरणातून ६१.५१ दलघमी व चासकमान धरणातून २0.७0 दलघमी पाणी उजनीत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही धरणातून मिळून उजनीत ८२.२१ दलामी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी सोडले जाणार आहे. यापूर्वी १0.३0 टिएमसी पाणी सर्व धरणातून सोडण्याचा निर्णय होता. पाठपुरावा केल्याने ७ टिएमसी पाणी वाचले होते. ?जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून पोलीस, पाटबंधारे व महावितरण यांची बैठक घेण्यात आली होती. यानुसार १५ ते २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आजपासूनच पाणी सोडण्यात आले.