शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वीर जलाशयातून जेजुरीला पाणी

By admin | Updated: January 9, 2016 01:38 IST

जेजुरी शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा वीर जलाशयातूनच होऊ शकतो. या जलाशयातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पालिकेकडून देण्यात आला होता.

जेजुरी : जेजुरी शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा वीर जलाशयातूनच होऊ शकतो. या जलाशयातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पालिकेकडून देण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह आज वीर जलाशयावर जाऊन जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी सध्या नाझरे जलाशय आणि नीरा नदीवरील मांडकी डोहातून पाणीपुरवठा होत आहे; मात्र या दोन्ही योजनांतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नेहमीच नियोजन करावे लागते. शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने तीर्थक्षेत्राचे ठिकाण असूनही पाण्याचा प्रश्न नेहमीच गंभीर राहतो. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबाबत पालिकेत नागरिकांच्या सततच्या तक्रारी व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. पालिकेने यासाठी थेट वीर जलाशयातून जेजुरीसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वीर जलाशयावरून सुमारे २५ किमी लांबीची पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन्स बदलणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी साधारणपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता डी. एन. विजापूरकर आणि डी. एल. अंधारे यांच्यासह मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा सौ. सोनाली मोरे, माजी नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांनी वीर जलाशयावर जाऊन योजनेसाठी ज्या ठिकाणी जॅकवेल उभारण्यात येणार आहे. (वार्ताहर)