शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वीर जलाशयातून जेजुरीला पाणी

By admin | Updated: January 9, 2016 01:38 IST

जेजुरी शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा वीर जलाशयातूनच होऊ शकतो. या जलाशयातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पालिकेकडून देण्यात आला होता.

जेजुरी : जेजुरी शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा वीर जलाशयातूनच होऊ शकतो. या जलाशयातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पालिकेकडून देण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह आज वीर जलाशयावर जाऊन जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी सध्या नाझरे जलाशय आणि नीरा नदीवरील मांडकी डोहातून पाणीपुरवठा होत आहे; मात्र या दोन्ही योजनांतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नेहमीच नियोजन करावे लागते. शहराला दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने तीर्थक्षेत्राचे ठिकाण असूनही पाण्याचा प्रश्न नेहमीच गंभीर राहतो. यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबाबत पालिकेत नागरिकांच्या सततच्या तक्रारी व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. पालिकेने यासाठी थेट वीर जलाशयातून जेजुरीसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वीर जलाशयावरून सुमारे २५ किमी लांबीची पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन्स बदलणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी साधारणपणे ३० ते ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता डी. एन. विजापूरकर आणि डी. एल. अंधारे यांच्यासह मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा सौ. सोनाली मोरे, माजी नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांनी वीर जलाशयावर जाऊन योजनेसाठी ज्या ठिकाणी जॅकवेल उभारण्यात येणार आहे. (वार्ताहर)