शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

विजय मु-हे कुरुळी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदी भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी,चिंबळी, केळगाव आदी भागात ...

विजय मु-हे

कुरुळी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदी भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी,चिंबळी, केळगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे नदीचे प्रदूषण मोठया प्रमाणावर वाढले असून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीच्या आजूबाजूच्या परिसरात यामुळे दुर्गंधी पसरली आहे. जलचर प्राणी व नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीमध्ये सोडण्यात आलेल्या गटारांमुळे पाणी दूषित झाले आहे. रब्बी हंगामात नदीकाठच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कांदा. ऊस. ज्वारी. बटाटा. गहू. मका. पालेभाज्या आदी पिकांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकांना नदीचे पाणी देताना त्यांच्या हातापायाला खाज येणे, डास चावल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नदीपात्रात प्रशासक प्रशासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. मात्र तोकड्या यंत्रणेमुळे इंद्रायणीच्या जलपर्णीची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. इंद्रायणी नदीत थेट ओढ्या-नाल्यातून दूषित आणि रसायनमिश्रित सांडपाणी थेट नदीत येत असल्याने जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रभावी योजना राबवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

इंद्रायणी नदीवरील पुलावरून ठिकठिकाणी नागरिक कचरा, प्लास्टिक, राडारोडा, नदीपात्रात बिनधास्तपणे टाकतात त्यांच्यावर देखील प्रशासनाने कारवाई करावी.

शांताराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

कुरुळी: (ता. खेड) परिसरात इंद्रायणी नदीवर पसरलेली जलपर्णी