शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

हवेली, दौंड, इंदापूरमध्ये आले पाणी

By admin | Updated: February 7, 2016 03:36 IST

१९७२च्या भीषण दुष्काळानंतर प्रथमच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते परंतु सध्या नवीन

लोणी काळभोर : १९७२च्या भीषण दुष्काळानंतर प्रथमच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते परंतु सध्या नवीन व जुना मुठा या दोन्ही कालव्यांना पाणी आल्यामुळे तीनही तालुक्यांत आनंदाला उधाण आले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी दौंड तालुक्यात दाखल झाले आहे. दौंड, इंदापूर, हवेली या तालुक्यांसाठी आणि जनाई उपसा सिंचन योजनेसाठी हे पाणी सोडण्यात आले असून, खडकवासला धरणातून १.२ ते १.४ टीएमसी पाणी आवश्यकतेनुसार सोडण्यात येत आहे. हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांना पिण्याची पाण्याची ऐन उन्हाळ्यात भेडसावणारी समस्या यामुळे काही अंशी का होईना दूर होण्यास मदत होणार आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी असून शेतकऱ्यांना शेती सिंचनसाठी घेता येणार नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष ठेवून कालव्याच्या कडेचा विद्युत पुरवठा खंडित करताना दिसत आहेत. पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत जलसंपदा विभागासह, महसूल व वीज वितरण कंपनी आणि पोलीस अधिकारी यांनी आवश्यक उपाययोजना केल्यास पाणीगळती रोखून बचत होईल. त्यानंतरच पुन्हा दौंड आणि इंदापूरसाठी दुसरे आवर्तन देणे शक्य होईल असा निर्णय घेण्यात आला आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू पावसाळ्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी असताना पावसाच्या कमतरतेमुळे या धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा झाला. परिणामी गेले तीन महिने नवा मुठा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले होते. पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या मध्ये १९९७मध्ये झालेल्या एका करारानुसार पुणेसह ११़५० टीएमसी सांडपाणी मुळा-मुठा नदीतून उचलून मुंढवा येथे या पाण्यावर प्रक्रिया करायची. नंतर हे पाणी जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणीपुरवठा करायचा असा करार झाला असताना; मात्र या पाण्यावर कसलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून मलजल व रसायनयुक्त पाणी शेतीला पुरविण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. या पाण्याचा दर्जा निकृष्ट असूनही दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी हे पाणी गुपचूप स्वीकारले आहे. परंतु जून महिन्यात पर्जन्यराजाचे जोरदार आगमन झाले तर बळीराजा या पाण्याला जोरदार विरोध करणार ही शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यांतील सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पाणीपुरवठा करताना झुकते माप मिळणार नाही हे गृहीत धरून शेतकऱ्यांनी पाण्याची आशा सोडली होती. मात्र या वेळी शेतीला पाणी मिळाले. आता नवा मुठा उजव्या कालव्याला इंदापूर व दौंड तालुक्याला पिण्यासाठी १.६0 टीएमसी पाणी मंजूर झाले आहे. दि. ५ फेब्रुवारीपासून हे पाणी कालव्यात सोडले आहे.साधारण पंधरा दिवस जरी कालव्यामधून हे पाणी वाहिले तर पाणी वाहणे बंद झाल्यानंतर साधारण दीड ते दोन महिने या तीनही तालुक्यांतील विहिरी व कूपनलिकांना भरपूर पाणी राहणार आहे. तसेच आगामी दोन महिने या परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे.