शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डद्वारे पाणी, लाभली आरोग्याची संजीवनी

By admin | Updated: February 12, 2017 04:43 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू झालेला शुद्ध पाणीपुरवठा करणारा प्रकल्प तक्रारवाडी ग्रामस्थांसाठी आरोग्याची जल संजीवनी ठरत आहे.

भिगवण : राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू झालेला शुद्ध पाणीपुरवठा करणारा प्रकल्प तक्रारवाडी ग्रामस्थांसाठी आरोग्याची जल संजीवनी ठरत आहे. चार वर्षांपूर्वी चालू झालेल्या या योजनेतून एटीएम कार्डद्वारे गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. शिवाय याच प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या ‘टाकाऊ’ पाण्यावर सुमारे २५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांमुळे परिसराला वनराईचे स्वरूप प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ आॅगस्ट २०१३ रोजी सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. तक्रारवाडी हे उजनी धरणाच्या कडेला पुनर्वसित झालेलं २१६६ लोकसंख्या असणार गाव आहे. या गावाला उजनीच्या पाणलोटक्षेत्रात विहीर खणून त्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. अशुद्ध आणि ११०० च्या पुढे असणाऱ्या टीडीएस पाण्यामुळे लोकांना पोटाचे विकार मुतखडा, मळमळणे, अतिसार इत्यादी असंख्य आजारांना तोंड द्यावे लागत होते. काही बोटावर मोजता येतील इतक्या लोकांकडे ‘फिल्टर’ची सुविधा उपलब्ध होती. परंतु सवसामान्य हा खर्च करू शकत नव्हते. हा नवीन प्रकल्प सुरू झाल्यापासून या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा मिळत आहे. विविध आजारांतून लोकांची मुक्तता झाली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली दिसून येत आहे. हा प्रकल्प गावच्या पूर्व बाजूला सुरू करण्यात आला असून गावातील ३०० कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहेत.या प्रकल्पाचा ‘मेंटेनन्स’ सुरळीतपणे चालावा या हेतूने सुरुवातीच्या काळात प्रत्येक कुटुंबाने १०० रुपयेप्रमाणे याचा मासिक पास ठेवण्यात आला होता. सदर योजना हायटेक करण्याच्या दृष्टीने आणि रोजच्या हिशोबातून सुटका व्हावी, या दिशेने वाटचाल करण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. कार्ड रिचार्ज केल्यानंतर ००.२५ पैसे प्रतिलिटर प्रमाणे महिनाभर पाणी मिळत आहे. हा प्रकल्पावर सरपंच आणि ग्रामसेवक एका आॅपरेटरच्या माध्यमातून लक्ष देत आहेत. स्वच्छता करण्यासाठी हा प्रकल्प आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बंद ठेवण्यात येतो. यामुळे लोकांचा एक दिवस कोरडा पाळण्याचे उद्दिष्ट आपोआप पूर्ण होते. परिणामी डेंगीला पायबंद बसण्यास मदत होते.या प्रकल्पामुळे गावातील लोक पोटाच्या आजार मुक्त झाले. स्वच्छ पाणी मिळाले तर आजारचे प्रमाण कमी होते, असा डॉक्टर सल्ला देत असतात. या प्रकल्पातून निघणारे टाकाऊ पाणी वाया न जावू देता यावर सुमारे २५०० झाडांची लागवड केल्याची माहिती तक्रारवाडी गावच्या महिला सरपंच शोभाताई वाघ यांनी दिल्ज्ञया प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध ठिकाणहून ग्रामस्थ येतात. असे आरोग्यदायी प्रकल्प जिल्हाभर सुरू व्हावेत, असा मानस गावचे उपसरपंच प्रशांत वाघ यांनी व्यक्त केला. कमी पैशात पाणी मिळत असल्याने गोरगरीब नागरिकही याचा लाभ उठवीत आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यात हा प्रकल्प पथदर्शी ठरावा. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय ठरू शकतो, असे मत इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी एम. के. बिचकुले यांनी व्यक्त केले.