शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डद्वारे पाणी, लाभली आरोग्याची संजीवनी

By admin | Updated: February 12, 2017 04:43 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू झालेला शुद्ध पाणीपुरवठा करणारा प्रकल्प तक्रारवाडी ग्रामस्थांसाठी आरोग्याची जल संजीवनी ठरत आहे.

भिगवण : राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू झालेला शुद्ध पाणीपुरवठा करणारा प्रकल्प तक्रारवाडी ग्रामस्थांसाठी आरोग्याची जल संजीवनी ठरत आहे. चार वर्षांपूर्वी चालू झालेल्या या योजनेतून एटीएम कार्डद्वारे गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. शिवाय याच प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या ‘टाकाऊ’ पाण्यावर सुमारे २५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांमुळे परिसराला वनराईचे स्वरूप प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ आॅगस्ट २०१३ रोजी सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. तक्रारवाडी हे उजनी धरणाच्या कडेला पुनर्वसित झालेलं २१६६ लोकसंख्या असणार गाव आहे. या गावाला उजनीच्या पाणलोटक्षेत्रात विहीर खणून त्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. अशुद्ध आणि ११०० च्या पुढे असणाऱ्या टीडीएस पाण्यामुळे लोकांना पोटाचे विकार मुतखडा, मळमळणे, अतिसार इत्यादी असंख्य आजारांना तोंड द्यावे लागत होते. काही बोटावर मोजता येतील इतक्या लोकांकडे ‘फिल्टर’ची सुविधा उपलब्ध होती. परंतु सवसामान्य हा खर्च करू शकत नव्हते. हा नवीन प्रकल्प सुरू झाल्यापासून या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा मिळत आहे. विविध आजारांतून लोकांची मुक्तता झाली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली दिसून येत आहे. हा प्रकल्प गावच्या पूर्व बाजूला सुरू करण्यात आला असून गावातील ३०० कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहेत.या प्रकल्पाचा ‘मेंटेनन्स’ सुरळीतपणे चालावा या हेतूने सुरुवातीच्या काळात प्रत्येक कुटुंबाने १०० रुपयेप्रमाणे याचा मासिक पास ठेवण्यात आला होता. सदर योजना हायटेक करण्याच्या दृष्टीने आणि रोजच्या हिशोबातून सुटका व्हावी, या दिशेने वाटचाल करण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. कार्ड रिचार्ज केल्यानंतर ००.२५ पैसे प्रतिलिटर प्रमाणे महिनाभर पाणी मिळत आहे. हा प्रकल्पावर सरपंच आणि ग्रामसेवक एका आॅपरेटरच्या माध्यमातून लक्ष देत आहेत. स्वच्छता करण्यासाठी हा प्रकल्प आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बंद ठेवण्यात येतो. यामुळे लोकांचा एक दिवस कोरडा पाळण्याचे उद्दिष्ट आपोआप पूर्ण होते. परिणामी डेंगीला पायबंद बसण्यास मदत होते.या प्रकल्पामुळे गावातील लोक पोटाच्या आजार मुक्त झाले. स्वच्छ पाणी मिळाले तर आजारचे प्रमाण कमी होते, असा डॉक्टर सल्ला देत असतात. या प्रकल्पातून निघणारे टाकाऊ पाणी वाया न जावू देता यावर सुमारे २५०० झाडांची लागवड केल्याची माहिती तक्रारवाडी गावच्या महिला सरपंच शोभाताई वाघ यांनी दिल्ज्ञया प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध ठिकाणहून ग्रामस्थ येतात. असे आरोग्यदायी प्रकल्प जिल्हाभर सुरू व्हावेत, असा मानस गावचे उपसरपंच प्रशांत वाघ यांनी व्यक्त केला. कमी पैशात पाणी मिळत असल्याने गोरगरीब नागरिकही याचा लाभ उठवीत आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यात हा प्रकल्प पथदर्शी ठरावा. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय ठरू शकतो, असे मत इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी एम. के. बिचकुले यांनी व्यक्त केले.