शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तात शेतीसाठी पाणी

By admin | Updated: March 29, 2016 03:32 IST

भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस

पाईट : भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्याचे आमदार बाबूराव पाचर्णे व दौंड तालुक्यातील किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी सोडण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.यानुसार प्रशासनाने गोपनीयता राखत पाणी सोडण्यासाठी धरणावर पोलीस बंदोबस्त ठेवला. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्यासह चाकण लोणीकंद, वडगाव मावळ, मंचर, खेडमधील सुमारे १२० पोलिसांचा मोठा बंदोबस्त या वेळी तैनात करण्यात आला. यामुळे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.यानंतर भामा आसखेडचे सिंचन व्यवस्थापनचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी पुणे पाटबंधाारे अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळाच्या आदेशाने सोमवारी दुपारी ३ वाजता ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले. हे आवर्तन १५ दिवस सुरू राहणार असून सुमारे ०.८८ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. धरणावरील बंदोबस्त पाहून धरणग्रस्त धरणावर जमा झाले. मात्र धरणग्रस्त कमी व पोलीस जास्त अशी स्थिती होती. या वेळी धरणग्रस्तांनी निवेदन देत शासनाचा निषेध केला. दौंड व शिरूर तालुक्यातील शेती वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलण्यात येत असून या भागातील कोहिंडे, कोळीये, वेल्हावळे, साबळेवाडी, कान्हेवाडी, तेकवाडी, वाघू शिवे, पराळे, अनावळे, कासारी या गावांना टंचाईस सामोरे जावे लागणार आहे, असे भामा आसखेड कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले. या वेळी दत्ता रौधळ, दत्तात्रय आवारी, नामदेव साळुंके, शंकर शिवेकर, बबन कुटे, लक्ष्मण करंडे, संदीप कोळेकर यांनी हे धरणग्रस्तांवर अन्याय करणारे असल्याचे सांगितले.(वार्ताहर)