शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

बंदोबस्तात शेतीसाठी पाणी

By admin | Updated: March 29, 2016 03:32 IST

भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस

पाईट : भामा-आसखेड धरणातून दौंड व शिरूर तालुक्यांतील शेतीसाठी सोमवारी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्याचे आमदार बाबूराव पाचर्णे व दौंड तालुक्यातील किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी सोडण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.यानुसार प्रशासनाने गोपनीयता राखत पाणी सोडण्यासाठी धरणावर पोलीस बंदोबस्त ठेवला. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्यासह चाकण लोणीकंद, वडगाव मावळ, मंचर, खेडमधील सुमारे १२० पोलिसांचा मोठा बंदोबस्त या वेळी तैनात करण्यात आला. यामुळे धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.यानंतर भामा आसखेडचे सिंचन व्यवस्थापनचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी पुणे पाटबंधाारे अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळाच्या आदेशाने सोमवारी दुपारी ३ वाजता ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले. हे आवर्तन १५ दिवस सुरू राहणार असून सुमारे ०.८८ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. धरणावरील बंदोबस्त पाहून धरणग्रस्त धरणावर जमा झाले. मात्र धरणग्रस्त कमी व पोलीस जास्त अशी स्थिती होती. या वेळी धरणग्रस्तांनी निवेदन देत शासनाचा निषेध केला. दौंड व शिरूर तालुक्यातील शेती वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलण्यात येत असून या भागातील कोहिंडे, कोळीये, वेल्हावळे, साबळेवाडी, कान्हेवाडी, तेकवाडी, वाघू शिवे, पराळे, अनावळे, कासारी या गावांना टंचाईस सामोरे जावे लागणार आहे, असे भामा आसखेड कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले. या वेळी दत्ता रौधळ, दत्तात्रय आवारी, नामदेव साळुंके, शंकर शिवेकर, बबन कुटे, लक्ष्मण करंडे, संदीप कोळेकर यांनी हे धरणग्रस्तांवर अन्याय करणारे असल्याचे सांगितले.(वार्ताहर)