शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: February 27, 2015 06:00 IST

अवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे विविध रोगाशी सामना करीत कसेबसे कांदापिक वाचवले. मात्र, आता निकृष्ठ बियानांमुळे बहुतांश

ओझर : अवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे विविध रोगाशी सामना करीत कसेबसे कांदापिक वाचवले. मात्र, आता निकृष्ठ बियानांमुळे बहुतांश ठिकाणी कांदा पिकाला डेंगळे आली आहेत. त्यामुळे नगदी कांदा पिकाचा हंगाम वाया गेला आहे. भांडवली खर्चासाठी कर्ज काढून कांद्याचे पीक घेतले; परंतु डेंगळांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ६२९४ हेक्टरवर कांद्याची लागवड असून येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांची पुढची युवा पिढी शेती व्यवसायात पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिकीकरणाची कास धरून मोठ्या उमेदीने शेती व्यवसायात उतरली आहे. कांदे बियाणे टाकण्याच्या काळात बियाणांचा प्रचंड तुटवडा निर्माण यामुळे कांदाउत्पादकांनी इतर शेतकऱ्यांकडून तसेच दुकानांमधून चढ्या दराने कांदा बी घेतले. मात्र याची गुणवत्ता तपासली नाही. त्यामुळे हे निकृष्ट बी टाकल्यामुळे त्यांना आता डेंगळाचा समाना करावा लागत आहे. नगदी पीक म्हणून कांदापिकावर शेतकऱ्याचे बारमाही प्रापंचिक अर्थकारण अवलंबून असते. डेंगळ्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते या वर्षी कोलमडणार आहेत. डेंगळा समस्यामुळे निकृष्ट बियाणांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या खासगी शेतकरी तसेच कंपन्यांवर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून पुढे येत आहे. डेंगळे आलेल्या तालुक्यातील सर्व कांद्याच्या प्लॉटची पाहणी करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांनी सांगितले.(वार्ताहर)