शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पाण्यासाठी दिघीकरांची भटकंती

By admin | Updated: May 30, 2017 02:43 IST

पालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : पालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जलसंकटात सापडलेल्या अनेक कुटुंबावर परिवारासह घरातील सर्व छोटी मोठी भांडी घेऊन पाण्याच्या शोधात दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ प्रशासनाने आणल्याचे वास्तव आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठ्याला दिघीकरांचा विरोध नसून पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर आक्षेप आहे. वारंवार तक्रारी, व त्या तक्रारींना अधिकाऱ्यांची मिळणारी उत्तरे यामुळे जनता जनार्दन हतबल झाली आहे. प्रशासन असो वा लोकप्रतिनिधी कुणालाही पर्वा नसली तरी पाण्यासाठी कंपनीला दांडी मारून परिवारासह पाण्याच्या शोधात फिरत असल्याचे भोसले यांनी सांगितले. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील पोलीस चौकीत पाणी भरायला आलेल्या अनेक कुटुंबांनी प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. पोलीस चौकीसमोरील गायकवाड रेसिडेन्सी येथे अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, पाणी कपात केल्यापासून पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. तर कधी पिण्याच्या पाण्याची साठवण होत नसल्याच्या तक्रारींचा पाऊस महिलावर्गानी पाडला. पाण्याची निर्माण झालेली भीषण परिस्थिती, पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंतीची वेळ, व पाण्यासाठी बुडालेला त्या दिवसाचा रोजगार यामुळे जगावे तरी कसे? असा गहन प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. दिघी परिसरातील पोलीस चौकीतील नळ, मॅगझिन चौकातील पाण्याची टाकीचा नळ, देवस्थान मंदिरातील नळ, व शेजारधर्म म्हणून पाण्याची मदत करणाऱ्या घरासमोर भांड्याच्या रांगा लागल्या आहेत. लहान बाल वृद्धांपासून सर्व जण डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन जातानाचे चित्र दिघी परिसरात पहावयास मिळत आहे. रस्त्यावरील पाण्याचे व्हॉल्व्ह सुद्धा रिकामे नाहीत. जेथून पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी नागरिक पाण्यासाठी गर्दी करीत आहेत. मॅगझिन चौकातील पाण्याच्या टाकीजवळील नळावर टेम्पोतून पाण्याची भांडी दाखल झाली. लांब पल्ल्यावर पाणी न्यावे लागते त्यामुळे परिसरातील दोन तीन कुटुंब मिळून टेम्पोमध्ये भांडी भरून आणल्याचे चालकाने सांगितले. यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी पाण्याच्या पुरवठ्याविषयीच्या करीत असलेल्या वल्गना फोल ठरली आहेत.पाण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दारात हुशार माणसाने पोलीस स्टेशनची व कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. परंतु पाण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणली आहे. या पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक गुन्हेगार येऊन हजेरी लावतात, तर कधी गुन्ह्याच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. आम्ही असा कुठलाही गुन्हा नोंद करण्यासाठी नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढलो आहोत. गुन्हेगारांना शिक्षा व आमच्या कुटुंबांना पाणी देऊन जीवनदान देण्याचं काम पोलीस चौकीतून होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.