शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पाण्यासाठी दिघीकरांची भटकंती

By admin | Updated: May 30, 2017 02:43 IST

पालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा

लोकमत न्यूज नेटवर्कदिघी : पालिकेच्या पाणी कपातीच्या निर्णयामुळे दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जलसंकटात सापडलेल्या अनेक कुटुंबावर परिवारासह घरातील सर्व छोटी मोठी भांडी घेऊन पाण्याच्या शोधात दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ प्रशासनाने आणल्याचे वास्तव आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठ्याला दिघीकरांचा विरोध नसून पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर आक्षेप आहे. वारंवार तक्रारी, व त्या तक्रारींना अधिकाऱ्यांची मिळणारी उत्तरे यामुळे जनता जनार्दन हतबल झाली आहे. प्रशासन असो वा लोकप्रतिनिधी कुणालाही पर्वा नसली तरी पाण्यासाठी कंपनीला दांडी मारून परिवारासह पाण्याच्या शोधात फिरत असल्याचे भोसले यांनी सांगितले. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील पोलीस चौकीत पाणी भरायला आलेल्या अनेक कुटुंबांनी प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. पोलीस चौकीसमोरील गायकवाड रेसिडेन्सी येथे अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, पाणी कपात केल्यापासून पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. तर कधी पिण्याच्या पाण्याची साठवण होत नसल्याच्या तक्रारींचा पाऊस महिलावर्गानी पाडला. पाण्याची निर्माण झालेली भीषण परिस्थिती, पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंतीची वेळ, व पाण्यासाठी बुडालेला त्या दिवसाचा रोजगार यामुळे जगावे तरी कसे? असा गहन प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. दिघी परिसरातील पोलीस चौकीतील नळ, मॅगझिन चौकातील पाण्याची टाकीचा नळ, देवस्थान मंदिरातील नळ, व शेजारधर्म म्हणून पाण्याची मदत करणाऱ्या घरासमोर भांड्याच्या रांगा लागल्या आहेत. लहान बाल वृद्धांपासून सर्व जण डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन जातानाचे चित्र दिघी परिसरात पहावयास मिळत आहे. रस्त्यावरील पाण्याचे व्हॉल्व्ह सुद्धा रिकामे नाहीत. जेथून पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी नागरिक पाण्यासाठी गर्दी करीत आहेत. मॅगझिन चौकातील पाण्याच्या टाकीजवळील नळावर टेम्पोतून पाण्याची भांडी दाखल झाली. लांब पल्ल्यावर पाणी न्यावे लागते त्यामुळे परिसरातील दोन तीन कुटुंब मिळून टेम्पोमध्ये भांडी भरून आणल्याचे चालकाने सांगितले. यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी पाण्याच्या पुरवठ्याविषयीच्या करीत असलेल्या वल्गना फोल ठरली आहेत.पाण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दारात हुशार माणसाने पोलीस स्टेशनची व कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. परंतु पाण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणली आहे. या पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक गुन्हेगार येऊन हजेरी लावतात, तर कधी गुन्ह्याच्या तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. आम्ही असा कुठलाही गुन्हा नोंद करण्यासाठी नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढलो आहोत. गुन्हेगारांना शिक्षा व आमच्या कुटुंबांना पाणी देऊन जीवनदान देण्याचं काम पोलीस चौकीतून होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.