शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात मांडणार पाणीप्रश्न

By admin | Updated: November 27, 2015 01:33 IST

येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या चक्रीउपोषणास भेट देऊन पाठिंबा दर्शवत चासकमानचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.वळसे पाटील म्हणाले कि पाणी देण्याचा निर्णय आमच्या विरोधात गेला त्यामुळे न्यायालय व लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा पर्याय निवडावा लागला. तरी देखील सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावा लागेल. तरी याबबत पाठबंधारे मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री राम शिंदे यांचेशी चर्चा केली आहे. तरी या ठिकाणी चासकमान च्या असलेल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात तरी यांनतर देखील जर सरकारला जग आली नाहीच तर अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नसल्याचे सांगत प्रत्येक वेळेस शेतकरी शांततेत आंदोलन करतील असे नाहीच तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील वळसे यांनी सांगितले. आंदोलन स्थळी चासकमान चे सहाय्यक अभियंता एस. जि. शहापुरे, शाखा अभियंता एस. एन. भुजबळ, शाखा अभियंता एस. बि. संतीकर उपविभागीय अभियंता यु. जि. मुंडे हे आले असता चार दिवसानंतर आलेल्या अधिकाऱ्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करत चांगले फैलावर धरले व या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी या ठिकाणच्या क्षेत्रातील कोणत्या तळ्या खाली किती क्षेत्र ओलिताखाली आहे हे या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले असता त्यांना ते आजीबात सांगता आले आही. यावेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी देखील आंदोलकांची भेट घेत मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सभापती सिद्धार्थ कदम, बाजार समिती उपसभापती मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस किशोर गायकवाड, खंडाळेचे सरपंच राजेंद्र नरवडे, बाभूळसर चे सरपंच दशरथ फंड, बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे, समाधान डोके, बुरुंजवाडीचे सरपंच पूनम टेमगिरे, प्रवीण कौटकर यांसह आदी मान्यवर तसेच शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)