शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

‘रोडवेज‘च्या खडी प्लांटमुळे पाणी दूषित

By admin | Updated: January 10, 2017 02:30 IST

रोडवेज कंपनीच्या सुरू असलेल्या खडी प्लांटमुळे या परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.

भोर : रोडवेज कंपनीच्या सुरू असलेल्या खडी प्लांटमुळे या परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. याबरोबरच येथील पाण्याचे स्रोत खराब होत आहेत. या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केळवडे ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील चेलाडीजवळ केळवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रोडवेज कंपनीचा खडी प्लांट आहे. या खडीच्या धुरळ्यामुळे शेजारच्या शेतातील पिके खराब होतात. खडीमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असून पिण्याचे पाणी खराब होते. यामुळे ग्रामपंचायतीने रोडवेज कंपनीला खडी प्लांट बंद करावा, असे पत्र दिले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तहसीलदारांना शेतकरी व ग्रामपंचायतीने हा प्रकल्प बंद व्हावा, यासाठी निवेदन दिले होते. त्यानुसार तहसीलदार यांनी रोडवेज कंपनीला हा प्लांट बंद करण्याचे आदेश दिले; मात्र तरीही कंपनीने तो बंद केला नाही. हा प्रकल्प जबरदस्तीने सुरू ठेवला असून शेतकऱ्यांना धमकावले जात असल्याचे केळवडे गावचे सरपंच शांताराम जायगुडे यांनी सांगितले. दरम्यान, रोडवेज कंपनीने तहसीलदारांचे आदेशाचे पालन न केल्याने केळवडे गावातील शेतकऱ्यांनी कंपनीच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कंपनी बंद करण्याची मागणी राजगड पोलीस ठाण्याकडे सह्यांचे निवेदन देऊन केली आहे. (वार्ताहर)