शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बारामतीच्या पश्चिम भागात पाणीसंकट

By admin | Updated: May 12, 2017 04:55 IST

बारामतीचा पश्चिम पट्टा हा जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे येथील गावे तहानलेलीच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसुपे : बारामतीचा पश्चिम पट्टा हा जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे येथील गावे तहानलेलीच आहेत. याठिकाणी दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवलेले असते. त्यामुळे या परिसरात सुपे प्रादेशिक योजना राबवून सुपे गणात येणाऱ्या गावांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत माणसांबरोबर पशुधन जगवणे जिकिरीचे झाले आहे. गेली तीन वर्षांपासून या पट्ट्यातील गावांमध्ये खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. गेल्या वर्षी शासनाने तालुक्यातील काही गावे ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असल्याने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. मात्र शासनाचा या गावांना अद्याप कुठलाच निधी प्राप्त झालेला नाही. अशा या परिस्थितीत येथील नागरिक दुष्काळाशी सामना करीत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील शेतकऱ्यांची वीजबिल माफ केलेले नाही. त्यामुळे कृषिपंप न चालवता २५ ते ३० हजार रुपये वीज बिल आले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सुप्यासह बोरकरवाडी, कुतवळवाडी, चांदगुडेवाडी, वढाणे, भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, नारोळी, कोळोली आणि काऱ्हाटी आदी गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यातील काही गावांना मोरगाव प्रादेशिकचे पाणी चालू आहे. मात्र नाझरे धरणात नसल्यास त्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सुपे गावठाण तलावात वरवंड तलावातून पाणी आणून सुपे प्रादेशिक योजना करण्यात यावी. त्यामुळे येथील गावांचा कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. यापूर्वीच सन २०१४ साली ग्रामविकास मंत्रालयाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या मालन चांदगुडे यांनी दिली. सद्यस्थितीत पानसरेवाडी अंतर्गत असणाऱ्या कुदळेमळ्यातील नळपाणी पुरवठ्याची शासकीय विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे कुदळेमळा, तांबेवस्ती, गदादे वस्ती, घोडमळा आणि बोबडेमळा आदी ठिकाणचा नळपाणी पुरवठा योजना गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाला आहे, अशी माहिती यादव कुदळे यांनी दिली.