शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

तलाव भरल्यानंतरच पाणी बंद

By admin | Updated: April 9, 2016 01:48 IST

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भामा आसखेडचे पाणी भीमा नदीमध्ये १२ दिवसांपासून सोडण्यात आले असून दौंड तालुक्यातील तीन बंधारे भरले आहेत

तळेगाव ढमढेरे : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भामा आसखेडचे पाणी भीमा नदीमध्ये १२ दिवसांपासून सोडण्यात आले असून दौंड तालुक्यातील तीन बंधारे भरले आहेत, तर चार बंधारे कोरडे आहेत. हे भरल्यानंतरच पाणी बंद करण्यात येईल, असे कोंढापूर पाटबंधारे शाखाधिकारी जे. डी. संकपाळ यांनी सांगितले. कोंढापुरी पाटबंधारेचे शाखाधिकारी जे. डी. संकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी व पिण्यासाठी २८ मार्चपासून भामा-आसखेड धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव, सादलगाव व कानगाव हे तीन बंधारे भरले असून सोनवडी, खोरवडी, देऊळगावराजे व पेडगाव हे चार बंधारे कोरडे आहेत. ९०० घनफूट प्रतिसेकंदाने हे पाणी सोडण्यात आलेले आहे. साधारण पाच दिवसांमध्ये हे बंधारे भरतील. पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संकपाळ यांनी सांगितले, शिरूर तालुक्यातील राज्य विद्युत मंडळाच्या कोरेगाव भीमाचे शाखाधिकारी चंद्रशेखर महाजन यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित न केल्यामुळे शेतकऱ्यांनी महाजन यांच्यावर कार्यवाही करावी, याबाबत पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, असे संकपाळ यांनी सांगितले. आज केलेल्या नोंदीनुसार भामा-आसखेड धरणात पाणीसाठा ४०.८५ टक्के शिल्लक आहे. सध्या दुसरे आवर्तन सुरू असून गरज भासल्यास तिसरे आवर्तन सोडणार आहे. (वार्ताहर)