शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

तलाव भरल्यानंतरच पाणी बंद

By admin | Updated: April 9, 2016 01:48 IST

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भामा आसखेडचे पाणी भीमा नदीमध्ये १२ दिवसांपासून सोडण्यात आले असून दौंड तालुक्यातील तीन बंधारे भरले आहेत

तळेगाव ढमढेरे : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके जळू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भामा आसखेडचे पाणी भीमा नदीमध्ये १२ दिवसांपासून सोडण्यात आले असून दौंड तालुक्यातील तीन बंधारे भरले आहेत, तर चार बंधारे कोरडे आहेत. हे भरल्यानंतरच पाणी बंद करण्यात येईल, असे कोंढापूर पाटबंधारे शाखाधिकारी जे. डी. संकपाळ यांनी सांगितले. कोंढापुरी पाटबंधारेचे शाखाधिकारी जे. डी. संकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार : पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी व पिण्यासाठी २८ मार्चपासून भामा-आसखेड धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव, सादलगाव व कानगाव हे तीन बंधारे भरले असून सोनवडी, खोरवडी, देऊळगावराजे व पेडगाव हे चार बंधारे कोरडे आहेत. ९०० घनफूट प्रतिसेकंदाने हे पाणी सोडण्यात आलेले आहे. साधारण पाच दिवसांमध्ये हे बंधारे भरतील. पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संकपाळ यांनी सांगितले, शिरूर तालुक्यातील राज्य विद्युत मंडळाच्या कोरेगाव भीमाचे शाखाधिकारी चंद्रशेखर महाजन यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत पुरवठा खंडित न केल्यामुळे शेतकऱ्यांनी महाजन यांच्यावर कार्यवाही करावी, याबाबत पाटबंधारे खाते व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, असे संकपाळ यांनी सांगितले. आज केलेल्या नोंदीनुसार भामा-आसखेड धरणात पाणीसाठा ४०.८५ टक्के शिल्लक आहे. सध्या दुसरे आवर्तन सुरू असून गरज भासल्यास तिसरे आवर्तन सोडणार आहे. (वार्ताहर)