शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कालव्याने पाणी द्या; नाहीतर जमीनही देणार नाही!

By admin | Updated: July 26, 2016 05:17 IST

आजवर कालव्याद्वारे पाण्याचा थेंबही मिळाला नाही. उलट आमच्या जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के टाकून दडपशाही सुरू आहे. एक तर कालव्याने पाणी द्या, नाही तर जमिनीवरील शिक्के

आंबेठाण : आजवर कालव्याद्वारे पाण्याचा थेंबही मिळाला नाही. उलट आमच्या जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के टाकून दडपशाही सुरू आहे. एक तर कालव्याने पाणी द्या, नाही तर जमिनीवरील शिक्के काढून सात-बारा कोरा करा, अशी आक्रमक भुमिका कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. याविरोधात लवकरच याचिका दाखल करणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.भामा आसखेड धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी आल्यानंतर वषार्नुवर्षे जिरायती असणारी जमीन बागायती केली जाईल, या आशेपायी अनेकांनी जमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के पडण्यास फारसा विरोध केला नाही. परंतु धरणाच्या पाण्याचे वाटपदेखील झाले आहे. त्यातच उजवा कालवा जवळपास रद्द झाल्यातच जमा आहे. त्यामुळे जमिनीस कालव्याद्वारे पाणी मिळणार नाही, पण जमिनीवर शिक्के मात्र पडलेले आहेत. अशा कात्रीत या गावचा शेतकरी सापडला आहे. त्यामुळे आता काहीही झाले तरी जमीन पुनर्वसनासाठी देणारच नाही, असा आक्रमक पवित्रा कोरेगाव खुर्दच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. भामा आसखेड धरणाच्या बुडीत क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी जमीन म्हणून धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या या जमिनी देण्यात आल्या आहेत. या गावातील जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुनर्वसनासाठी जमीन राखीव असल्याचे शिक्के पडले आहेत. पुनर्वसनासाठी जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी पाच शेतकऱ्यांनी या मिळालेल्या जमिनी अन्य त्रयस्थ लोकांना विकल्या आहेत. त्यामुळे हे शेतकरी ताबा घेण्यास आल्यानंतर त्यांच्यात आणि मूळ व जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांत वादावादी होत आहे. अशा प्रकारे जमिनीचा ताबा घेण्यासाठी शेतकरी आल्यानंतर कोरेगाव ग्रामस्थांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्हाला पाणी न देता आमच्या जमिनीवर ताबा देऊन आमच्यावर अन्याय केला जात असून याविरोधात आम्ही स्थगिती मागणार आहोत, तसेच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रसंगी बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव, काळुराम कडूसकर, गेनभाऊ कडूसकर, शांताराम कडूसकर, बबन म्हसे, सोपान गाळव, बबन गोगावले, काळुराम गाळव, मारुती गाळव, रामचंद्र गोगावले, राजाराम गोगावले, किसन शेळके, बबन दोंद, शिवनाथ झांबरे, प्रकाश दोंद, मधुकर शेळके, भिवा गाळव, नामदेव झांबरे, संजय झांबरे, किसन गोगावले, उत्तम कडूसकर यांच्यासह शेतकरीबांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(वार्ताहर)माझी जमीन कालव्यासाठी आणि पुनर्वसनासाठी अशा दोन कारणांसाठी संपादित केली आहे. एकाच शेतकऱ्यांची जमीन दोन कारणांसाठी संपादित करून माझ्यावर अन्याय केला आहे. जिवापाड फुलविलेली शेती दुसऱ्याला द्यावी लागली तर जगून उपयोग नाही.काळुराम कडूसकर,शेतकरी, कोरेगाव खुर्दसर्व पीकपाणी नोंदीचा अहवाल हा कोतवालाने जागेवर जाऊन केलेला आहे.डी. डी. कोठावळे, तलाठी