शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

हनुमाननगरमध्ये आले पाणी, नागरिकांनी कळशी, हंड्यांनी उभारली गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:10 IST

आंबेगाव खुर्दजवळील शनिनगरपासून केवळ हाकेच्या अंतरावरील नगर म्हणजे हनुमाननगर. पण गेली दोन दशके 'पाण्यासाठी साडेसाती' पाठीमागे लागावी असा त्रास ...

आंबेगाव खुर्दजवळील शनिनगरपासून केवळ हाकेच्या अंतरावरील नगर म्हणजे हनुमाननगर. पण गेली दोन दशके 'पाण्यासाठी साडेसाती' पाठीमागे लागावी असा त्रास भोगत होते. या गावातील तब्बल चार हजार नागरिक वीस वर्षांपासून नळाच्या पाण्यापासून वंचित होते. खोल पाण्याच्या विहिरीतून पाणी शेंदणे, दिवसभर पाण्यासाठी वणवण फिरणे, पाण्याच्या टॅकरची वाट पाहाणे, पाण्यावरून होणारी भांडणं आणि तंटा ही यांची नित्याची गोष्ट बनली होती. परंतु जनहित विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी धनकवडी सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी 'हनुमाननगरला नळाने पाणीपुरवठा व्हावा' यासाठी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घरोघरी आले.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात सच्चाईमाता मंदिर, वाघजाईनगर परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून आंबेगाव खुर्दसाठी पाणीपुरवठा केला जात होता. साधारण दोन अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबेगाव खुर्द परिसरात वाघजाईनगरमधील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ तास वेळ आणि लाखो रुपयांचे वीजबिल, असा मोठा भुर्दंड महापालिकेला सोसावा लागत होता. मात्र, नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्यामुळे बारा इंची पाईपलाईन दरम्यान सबलाईनमधून हनुमाननगर आणि आंबेगाव खुर्द या दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करत महापालिकेच्या लाखो रुपयांची बचत केली. याकामी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव, उपअभियंता कुणाल यादव, मुकादम नंदकुमार पाटील आणि सुपरवायझर कुमार निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

------------------------

(१) हनुमाननगर गावात मी लहानाचा मोठा झालो, पण गावाला काही पाणी आलं नाही. मात्र आज गुढीपाडव्याला गावातील नळाला पाणी आलं. त्यामुळे पाडवा सुखाचा झाला आहे.

- अमित थोपटे, नागरिक (हनुमाननगर)

(२) पहाट झाली की, स्नान, स्वयंपाक सारं काही बाजूला ठेऊन पाण्यासाठी वणवण करायची हाच आमचा रोजचा जीवनक्रम होता. परंतु आज घरच्या नळाला पाणी आलं आणि डोक्यावरचं हंड्यांचं ओझं कायमचं हलकं झालं.

- अर्चना मोहोळ रहिवासी (हनुमाननगर)

(३) आमच्या भागाला पाण्याचा वनवास होता. पण आता हा वनवास संपला आहे. घरोघरी पाणी आल्याने सर्व आनंदात आहेत.

-शालन खोत, रहिवासी (हनुमाननगर)