शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

हनुमाननगरमध्ये आले पाणी, नागरिकांनी कळशी, हंड्यांनी उभारली गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:10 IST

आंबेगाव खुर्दजवळील शनिनगरपासून केवळ हाकेच्या अंतरावरील नगर म्हणजे हनुमाननगर. पण गेली दोन दशके 'पाण्यासाठी साडेसाती' पाठीमागे लागावी असा त्रास ...

आंबेगाव खुर्दजवळील शनिनगरपासून केवळ हाकेच्या अंतरावरील नगर म्हणजे हनुमाननगर. पण गेली दोन दशके 'पाण्यासाठी साडेसाती' पाठीमागे लागावी असा त्रास भोगत होते. या गावातील तब्बल चार हजार नागरिक वीस वर्षांपासून नळाच्या पाण्यापासून वंचित होते. खोल पाण्याच्या विहिरीतून पाणी शेंदणे, दिवसभर पाण्यासाठी वणवण फिरणे, पाण्याच्या टॅकरची वाट पाहाणे, पाण्यावरून होणारी भांडणं आणि तंटा ही यांची नित्याची गोष्ट बनली होती. परंतु जनहित विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी धनकवडी सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी 'हनुमाननगरला नळाने पाणीपुरवठा व्हावा' यासाठी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाणी घरोघरी आले.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात सच्चाईमाता मंदिर, वाघजाईनगर परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून आंबेगाव खुर्दसाठी पाणीपुरवठा केला जात होता. साधारण दोन अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबेगाव खुर्द परिसरात वाघजाईनगरमधील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी २४ तास वेळ आणि लाखो रुपयांचे वीजबिल, असा मोठा भुर्दंड महापालिकेला सोसावा लागत होता. मात्र, नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्यामुळे बारा इंची पाईपलाईन दरम्यान सबलाईनमधून हनुमाननगर आणि आंबेगाव खुर्द या दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करत महापालिकेच्या लाखो रुपयांची बचत केली. याकामी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव, उपअभियंता कुणाल यादव, मुकादम नंदकुमार पाटील आणि सुपरवायझर कुमार निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

------------------------

(१) हनुमाननगर गावात मी लहानाचा मोठा झालो, पण गावाला काही पाणी आलं नाही. मात्र आज गुढीपाडव्याला गावातील नळाला पाणी आलं. त्यामुळे पाडवा सुखाचा झाला आहे.

- अमित थोपटे, नागरिक (हनुमाननगर)

(२) पहाट झाली की, स्नान, स्वयंपाक सारं काही बाजूला ठेऊन पाण्यासाठी वणवण करायची हाच आमचा रोजचा जीवनक्रम होता. परंतु आज घरच्या नळाला पाणी आलं आणि डोक्यावरचं हंड्यांचं ओझं कायमचं हलकं झालं.

- अर्चना मोहोळ रहिवासी (हनुमाननगर)

(३) आमच्या भागाला पाण्याचा वनवास होता. पण आता हा वनवास संपला आहे. घरोघरी पाणी आल्याने सर्व आनंदात आहेत.

-शालन खोत, रहिवासी (हनुमाननगर)