शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

पाणीबचतीसाठी आता हवे गावोगावचे ‘वॉटर बजेट’!

By admin | Updated: February 8, 2016 02:11 IST

नद्यांवर धरणे बांधण्यापूर्वी नदीचे पाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वाहत जात होते. पाण्यावर जेवढा वरच्या लोकांचा हक्क आहे, तेवढाच खालच्या लोकांचाही आहे

पुणे : नद्यांवर धरणे बांधण्यापूर्वी नदीचे पाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वाहत जात होते. पाण्यावर जेवढा वरच्या लोकांचा हक्क आहे, तेवढाच खालच्या लोकांचाही आहे. मात्र, तहानलेल्याला पाणी देण्याची संस्कृती विसरून पाण्यावर आपापला हक्क सांगण्याची, वाद घालण्याची विकृती फोफावत आहे. शासनाने गावोगावचे ‘वॉटर बजेट’ करून त्याप्रमाणे पीक पद्धती बदलली पाहिजे, असे मत इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे तांत्रिक संचालक प्रा. डॉ. राजेंद्र सराफ यांनी आज येथे व्यक्त केले.दुष्काळाच्या छटा ग्रामीण भागात गडद होत चालल्या असून, धरणसाठ्यातील तोकडे पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरविण्याचे आव्हान शासन यंत्रणेपुढे आहे. वेगवेगळ्या धरणांचे पाणी अन्य भागाला देण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध होत आहे. विशेषत: राजकीय मंडळी या विषयातही प्रादेशिक राजकारण करून आंदोलनांचा पवित्रा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर, जलतज्ज्ञ या विषयाकडे कसे पाहतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.डॉ. सराफ म्हणाले, ‘‘नदी सागराला मिळते. नदीवर धरण बांधण्यापूर्वी नदी खालच्या टोकापर्यंत वाहत जात होती. नदीच्या काठावरील सर्व गावांचा अधिकार या पाण्यावर होता. नैसर्गिकरीत्या पाण्यावर जेवढा नदीच्या वरच्या भागातील लोकांचा हक्क होता, तेवढाच खालच्या लोकांचाही होता आणि आहे. नदीवर धरणे बांधल्याने वरच्या भागात पाणी अडले. त्या पाण्यावर या नदीच्या खालच्या टोकावर राहणाऱ्यांचाही नैसर्गिक हक्क आहे. पाण्यावर पशुपक्ष्यांचाही हक्क आहे.’’(प्रतिनिधी)खरे तर शासनाने तहान लागल्यावर विहीर न खोदता प्रत्येक गावाचे वॉटर बजेट केले पाहिजे. त्यानुसार कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे त्या-त्या भागात नियोजन केले पाहिजे. पाऊस भरपूर असेल तेव्हा उसलागवडीला वाव दिला पाहिजे. दर वर्षी शासनाने वॉटर बजेट केले पाहिजे. पाण्याचा कोणत्या कारणासाठी किती वापर होतो, हे तपासण्यासाठी वॉटर फूटप्रिंट काढली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. सराफ यांनी व्यक्त केली.