शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

भादलवाडी तलावात आले पाणी!

By admin | Updated: November 17, 2014 05:19 IST

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत तलावावर येणाऱ्या ‘चित्रबलाक’ पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला त्याचा फायदा होणार आहे, असा आशावाद पक्षिप्रेमींनी व्यक्त केला. ‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी (दि.७) वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत असणारी बाभळीची झाडे पाणी नसल्यामुळे (पाणीपातळी कमी झाल्यामुळे) उघडी पडली होती. या धर्तीवर तलावात पाणी येऊ लागल्याने पक्षिप्रेमी आनंदात आहेत. भादलवाडी तलाव चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगगार आहे. दरवर्षी हजारो पक्षी या ठिकाणी विणीच्या हंगामासाठी येतात. परंतु विणीचा हंगाम यशस्वी होण्यासाठी तलावामध्ये भरपूर पाणी असणे गरजेचे असते. पाणी असल्यास चित्रबलाक पक्ष्यांबरोबर विविध ५६ जातींच्या पक्ष्यांना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होत नाही. मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने पक्ष्यांचे आगमन होण्यापूर्वीच ही झाडे उघडी पडली होती. ‘लोकमत’ने याबाबत पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले होेते. त्यानंतर जलसंपदा खात्याने या वृत्ताची दखल घेत शनिवार (दि. १५) सायंकाळपासून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाण्याचा विसर्ग वाढवून तलाव शंभर टक्के भरण्याची मागणी शेतकरी, पक्षिमित्र यांच्याकडून होत आहे. पाण्यामुळे पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य व निवाऱ्याची सोय होणार आहे.