शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

भादलवाडी तलावात आले पाणी!

By admin | Updated: November 17, 2014 05:19 IST

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलावामध्ये शनिवार (दि. १५) पासून खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत तलावावर येणाऱ्या ‘चित्रबलाक’ पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाला त्याचा फायदा होणार आहे, असा आशावाद पक्षिप्रेमींनी व्यक्त केला. ‘लोकमत’ने याबाबत शुक्रवारी (दि.७) वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच चित्रबलाक पक्ष्यांची वसाहत असणारी बाभळीची झाडे पाणी नसल्यामुळे (पाणीपातळी कमी झाल्यामुळे) उघडी पडली होती. या धर्तीवर तलावात पाणी येऊ लागल्याने पक्षिप्रेमी आनंदात आहेत. भादलवाडी तलाव चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगगार आहे. दरवर्षी हजारो पक्षी या ठिकाणी विणीच्या हंगामासाठी येतात. परंतु विणीचा हंगाम यशस्वी होण्यासाठी तलावामध्ये भरपूर पाणी असणे गरजेचे असते. पाणी असल्यास चित्रबलाक पक्ष्यांबरोबर विविध ५६ जातींच्या पक्ष्यांना वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होत नाही. मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने पक्ष्यांचे आगमन होण्यापूर्वीच ही झाडे उघडी पडली होती. ‘लोकमत’ने याबाबत पाठपुरावा करून वृत्त प्रकाशित केले होेते. त्यानंतर जलसंपदा खात्याने या वृत्ताची दखल घेत शनिवार (दि. १५) सायंकाळपासून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाण्याचा विसर्ग वाढवून तलाव शंभर टक्के भरण्याची मागणी शेतकरी, पक्षिमित्र यांच्याकडून होत आहे. पाण्यामुळे पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य व निवाऱ्याची सोय होणार आहे.