शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

बारामती शहराला एक दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:18 IST

नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने बारामती शहराला फेब्रुवारी अखेरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे

बारामती : नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने बारामती शहराला फेब्रुवारी अखेरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.शुक्रवार दि. २२ जानेवारीपासून शहराच्या विविध भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गुरुवारी २१ जानेवारीपासूनच काही भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरूनगर, पतंगशानगर, महादेव मळा, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, मारवाड पेठ, गोकुळवाडी, मेडद रोड, कसबा संपूर्ण भागात या दिवशी पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या दिवसापासून एक दिवसाआड पाणी मिळेल. शुक्रवारी २२ जानेवारीपासून सिनेमा रोड, कचेरी, पान गल्ली, सटवाजी सोनवणेनगर, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड, आमराई, हंबीर बोळ, सिद्धेश्वर गल्ली, हरिकृपानगर, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, साई गणेशनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हाऊसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्टरोड, तावरे बंगला, विश्राम सोसायटी, जवाहरनगर येथे पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)