शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

बारामती शहराला एक दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 01:18 IST

नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने बारामती शहराला फेब्रुवारी अखेरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे

बारामती : नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने बारामती शहराला फेब्रुवारी अखेरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.शुक्रवार दि. २२ जानेवारीपासून शहराच्या विविध भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गुरुवारी २१ जानेवारीपासूनच काही भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे विवेकानंदनगर, अवधूतनगर, वसंतनगर, ख्रिश्चन कॉलनी, सद्गुरूनगर, पतंगशानगर, महादेव मळा, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, मारवाड पेठ, गोकुळवाडी, मेडद रोड, कसबा संपूर्ण भागात या दिवशी पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या दिवसापासून एक दिवसाआड पाणी मिळेल. शुक्रवारी २२ जानेवारीपासून सिनेमा रोड, कचेरी, पान गल्ली, सटवाजी सोनवणेनगर, नेवसे रोड, इंदापूर रोड, मार्केट यार्ड, आमराई, हंबीर बोळ, सिद्धेश्वर गल्ली, हरिकृपानगर, महावीर पथ, शंकर भोई तालीम परिसर, बुरुड गल्ली, साई गणेशनगर, मयूरेश्वर अपार्टमेंट, आनंदनगर, अशोकनगर, अकल्पित हाऊसिंग सोसायटी, विजयनगर, पोस्टरोड, तावरे बंगला, विश्राम सोसायटी, जवाहरनगर येथे पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)