शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 29, 2015 00:57 IST

खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

विश्वास खोड ल्ल पुणेपुण्यात पाणी बचतीसाठी पाणीकपातीचे धोरण राबविले जात आहे. असे असतानाही मात्र, खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही गळती सुरू आहे. मात्र ही गळती दुरुस्त करण्याऐवजी पाटबंधारे खात्याने महापालिकेलाच जबाबदार धरले आहे. महापालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते. कालव्याच्या मुखापासून पर्वती पायथ्यापर्यंत पाणी येईपर्यंत काही ठिकाणी शेतासाठी, टँकर भरण्यासाठी, वॉशिंग सेंटरसाठी चोरून पाणी वापरले जाते. सध्या सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. मात्र हिंगण्याच्या डोंगराळ भागात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या गळतीमधून किती पाणी वाया जाऊन नदीत मिळते याचे मापन आजवर झालेले नाही. डोंगराळ भागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या हिंगण्यातील भागात कालवा दुरुस्त करणे अवघड असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने यापूर्वी केला आहे. या बाबत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेलाच जबाबदार धरले आहे. सिंचनासाठी आवर्तन सुरू नसताना कालव्यातील पाण्याची पातळी कमी असतानाही पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास प्रतिसेकंद तीनशे क्युसेक्सने पाणी द्यावेच लागते. त्यामुळे पूर्णपणे पाणी सोडणे थांंबविता येणार नाही, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून होणाऱ्या पालिका आणि खडकवासला पाटबंधारे विभागातील वादाची चर्चा यंदा फारशी झाली नाही. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा एक अब्ज घनफूट (टी.एम.सी.) पाणीसाठा अधिक असल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा असून, पुण्यावर पाणी कपातीची वेळ येणार नाही, असे आश्वासन दिले जात आहे.1पावसाविषयी खात्री नसताना शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पालिकेचे अधिकारी चिंताग्रस्त आहेत. प्रत्यक्षात कालव्यातून गळती होणाऱ्या पाण्याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागच नव्हे तर तत्कालीन पालक मंत्रीही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. दर आवर्तनाच्या वेळी या मुठा कालव्यातून पाणी वाया जात आहे. सध्याही सिंचनासाठी पाणी सोडले जात असताना हिंगणे भागात या कालव्यातून धो-धो पाण्याची गळती होत आहे.2महानगरपालिका पंधरा टी.एम.सी. पाण्यासाठी दरवर्षी २७ कोटी रुपये खडकवासला पाटबंधारे विभागास देते. जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागच जबाबदार असून, त्याबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठी असलेल्या पाण्याची नासाडी अशाच प्रकारे होत राहणार असल्याचे स्पष्ट आहे.