शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांनाही दुबार पेरणीची चिंता

By admin | Updated: July 10, 2015 01:48 IST

अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतासाठी पैसे काढले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

आळंदी : जवळ पैसे नसतील, तरी सावकाराकडून व्याजाने, जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेकडून किंवा पर्याय म्हणून पतसंस्थेकडून अनेक शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतासाठी पैसे काढले; मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तर, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पावसाचा थेंबही पडला नसल्यामुळे हा भाग कोरडा ठाक असल्याची चिंता आषाढीवारीसाठी आळंदीत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरुवातीच्या काळात मराठवाड्यासह काही भागांत चांगला पाऊस झाला. ‘भगवंतावर’ भरोसा असलेल्या या शेतकऱ्यांनी पाऊस पडला आहे... तो पुढेही पडेल या भोळ्या आशेने व्याजाने, उसनवारीने पैसे काढून बाजारातील उपलब्ध महागडे बी-बियाणे, खत, औषधी खरेदी केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने मारलेल्या दडीने हाच शेतकरी हवालदील नव्हे, तर भयभीत झाला आहे. तरीही याची पर्वा न करता संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली व विठुरायाच्या भेटीची ओढ त्यांना बसू देत नाही. कितीही संकट आले, तरी निधड्या छातीची ढाल करून संकट झेलण्याची, सहन करण्याची शक्ती बाळगून जगणारा शेतकरी भजन-कीर्तनात, टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन होतोय, हेच वारकरी सांप्रदायाचे वैशिष्ट्य! माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांशी, वारकऱ्यांशी प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी राज्यातील विविध भागांतील पावसाची भयानक वास्तव स्थिती समोर आली. सोलापूर जिल्ह्यातील चंद्रकांत शिवलिंगअप्पा इमडे (रा. कुंभारी), सुरेश बापू भोसले (रा. वेळापूर, ता.माळशिरस), भरत सूर्यकांत धुमाळ (रा.टेंभूर्णी, ता.माढा) यांनी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाचा थेंबहा पडला नसल्याचे सांगितले. पाऊसच पडला नसल्यामुळे पेरणी झाली नाही. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी नाही. उन्हाळ्यात सुरू असलेले टँकरचे पाणी आता पावसाळा असल्यामुळे ते बंद करण्यात आले आहेत. काही भागात टँकर तुरळक प्रमाणात चालू आहेत. माळशिरस तालुक्यात उजनी धरण आणि भाटघर धरणाचे पाणी कॅनॉलमध्ये थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्याच जिवावर लावलेला थोडा फार ऊस शेतात उभा आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांचा ऊस उभा आहे. ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचा ऊस उभा वाळून गेला आहे. शेतातील वस्त्यावर पाण्याची कसलीच सोय नाही. त्यामुळे या वस्त्यावर पाण्याची प्रचंड तारांबळ होत आहे. शेतकऱ्यांना सरकार साथ देत नाही. साथ दिली, तर गावातील पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील सुरेश बापू भोसले यांनी दिली. टेंभुर्णी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या दारातील व शेतातील अनेक जनावरे पाणी व चाऱ्याअभावी सोडून दिल्याचे सांगितले. तर, पंढरपूर तालुक्यात सध्या बोअर, हातपंपाला उपलब्ध असलेल्या पाणीपातळीवर कसे-बसे दिवस काढले जात असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या भागात मृगाचा पाऊस बऱ्यापैकी, तर काही भागात चांगला पाऊस पडला. तो पुढेही पडेल, या आशेवर उन्हा-तान्हात मशागत केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, थोडीशी वाढ झालेल्या या पिकांना पाऊसच नसल्याने ती वाळली आहेत. तर, काहींची वाळण्याच्या प्रक्रियेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्तमराव दादा पाटील उकले, रोहिदास मल्हारी वानखेडे या शेतकऱ्यांनी सांगितले, की पेरणीच्या वेळी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पाऊसच नाही. त्यामुळे पिके वाळली आहेत. (वार्ताहर)>  जून महिना संपला, तरी सोलापूर जिह्यात पावसाचा थेंब नाही. पिण्याचे पाणी जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करून देणे कठीण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दावणीची जनावरे मोकळी सोडून दिली आहेत.>  मराठवाड्यात पहिल्या पावसाच्या जिवावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पाऊस पडला नाही त्यामुळे कर्जात अडकलेल्या या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे भयानक संकट.>  सांगली, सातारा, जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; मात्र फक्त कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.>  भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊलीला घातले.>  औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या पावसाच्या आधारावर कपाशी, मका, बाजरी, मूग, तूर याची पेरणी करण्यात आली. मात्र, पावसामुळे ही पिके वाळली. पिण्याचे पाणी सध्या मिळत असले, तरी जनावरांना महागडा व न परवडणारा चारा घेऊन घालावा लागत असल्याचे अर्जुन चौधरी, भाऊसाहेब चौधरी, दिलीप वाघमारे, गणेश बोर्डे या शेतकऱ्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील लातूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलगा, शिरूर अनंतपाळ, देवळी या तालुक्यात पहिला पाऊस पडल्याने जवळपास ६५ ते ७० टक्के पेरण्या झाल्या, तर लातूर तालुक्यात पेरणीच झाली नाही, अशी माहिती या भागातील प्रल्हाद देवराम रोळे (रा. हालसी, ता. निलंगा), हरिश्चंद्र जंगमवाड (रा. चाकूर) यांनी दिली. >  उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत कमी प्रमाणात पाऊस झाला. या पावसात चांगल्या जमिनीत काही प्रमाणात पेरणी झाली, तर काही भागांत पेरणीच झाली नसल्याचे सांगण्यात आले. नांदेड, परभणी, हिंगोली या भागातही हीच परिस्थिती असल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. सांगली, सातारा भागातही हीच परिस्थिती आहे.