शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

देहूत बीज सोहळ्याला वारकऱ्यांनी गर्दी करू नये : कृष्ण प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST

तीर्थक्षेत्र देहूत ३० मार्चला बीज सोहळा आहे. मात्र, सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी संप्रदायातील ...

तीर्थक्षेत्र देहूत ३० मार्चला बीज सोहळा आहे. मात्र, सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी संप्रदायातील विविध वारकरी संस्थांचे पदाधिकारी, महाराज मंडळी व संप्रदायातील क्रियाशील मान्यवरांच्या समवेत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विशेष सुसंवाद बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपआयुक्त मंचक इप्पर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, बाळासाहेब महाराज शेवाळे, आत्माराम महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, पंडित महाराज क्षीरसागर, कल्याण महाराज गायकवाड, नरहरी महाराज चौधरी, राजाभाऊ रंधवे चोपदार, भगवान साकरे, लक्ष्मण पाटील, संग्राम भंडारे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, माजी शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख उत्तम गोगावले, सचिव अजित वडगावकर, अविनाश महाराज धनवे, पोलीस हवालदार मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, देहूत फार गर्दी झाल्यास आरोग्य सेवा व पोलीस प्रशासनावर ताण येईल. मात्र, कोरोना महामारी वाढेल. यामुळे सर्वांच्या आरोग्याचे दृष्टीने वारकरी संप्रदायाने देहूत यात्रेला गर्दी करू नये. विशेष म्हणजे, बंडातात्या कराडकरांनी संयमी भूमिका घ्यावी. शांततेला गालबोट लागेल असे विधान करू नये. नियमावली झुगारून सोहळा साजरा केला तर वारकरी संप्रदाय कोरोनाने बाधित होईल. संयम दाखवून तसेच शासनाच्या नियमवलीत अधीन राहून हा सोहळा संपन्न होईल. बीजोत्सव सोहळा देखील वारकरी आणि नागरिकांनी घरी बसून साजरा करावा.

दरम्यान, वारकरी संप्रदायावर धार्मिक कार्यक्रमांची बंधने शिथिल करून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, अखंड हरिनाम सप्ताह ५० ते १०० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी केली. बैठकीचे सूत्रसंचालन संग्रामबापू भंडारे, प्रस्ताविक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, तर धनवे महाराज यांनी आभार मानले.

राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर देहूत बीज सोहळा ५० वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षभर सर्व सण- उत्सव तसेच आषाढीवारी देखील आपण मोजक्या वारकऱ्यांत साजरी केली आहे. तरीही शासनाची भूमिका मदत करण्याची आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांवर बधने आहेत. सर्वांचे सुरक्षिततेसाठी हे नियोजन असून कोणीही सुरक्षिततेच्या बाबतीत आडमुठी भूमिका घेऊ नये.

रामनाथ पोकळे, सहआयुक्त.

२४ शेलपिंपळगाव बीज साेहळा

तीर्थक्षेत्र आळंदीत वारकऱ्यांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश.