शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करायचंय...मग ‘विवाहपूर्व’ मार्गदर्शन घ्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

नम्रता फडणीस पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर ...

नम्रता फडणीस

पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले. एका सुंदर नात्याची परिणिती घटस्फोटापर्यंत जात असेल तर नक्की काय चुकतंय याचा विचार करायला हवा आणि हे टाळायचे असेल तर तरुण-तरुणींनी विवाहपूर्व समुपदेशन करुन घेतले पाहिजे, असे सांगितले जात आहे.

समुपदेशनाद्वारे एकमेकांचे स्वभाव, विशिष्ट प्रसंग किंवा परिस्थितीमध्ये दोघांची वैचारिकता, एकमेकांबरोबर खरोखर संसार करायचा आहे का, कशा प्रकारे संसार सुरळीत होऊ शकेल हे जाणून घेता येईल. दोघेही परस्परपूरक नसतील तर मग लग्नाचे पाऊल उचलायचे का याचाही पुनर्विचार विवाहेच्छुक तरुण-तरुणींना करता येईल. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज असल्याचे विवाह समुपदेशक सांगतात.

“केवळ टाळेबंदीमध्येच नव्हे तर अलीकडच्या दोन दशकांत घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढत आले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्तिकेंद्रित’ समाजरचनेकडे चाललो आहोत. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. समोरच्या माणसाला स्वीकारण्याची आणि सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. लग्न का नि कशासाठी करायचं? त्यासाठी दोघांनी काय करायला हवं हे तरूण-तरूणींना शांतपणे नीट समजून सांगायला हवे,” असे लीना कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये दरवर्षी वाढ

गोव्याच्या कायदेमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता व्यक्त करीत विवाह नोंदणीच्या वेळी जोडप्यांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुण्यात गेल्या अडीच वर्षात परस्पर संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल झाले आहेत. विवाहपूर्व समुपदेशन हाच वाढते घटस्फोट रोखण्यावरील उत्तम उपाय असल्याचे विवाह समुपदेशकांना वाटते.

चौकट

लग्न कशासाठी हेच कळत नाही

“तरुणांमध्ये लग्न का करायचे याबाबत बरेचदा अस्पष्टता दिसून येते. वय झालंय किंवा घरचे म्हणतात म्हणून लग्न करायचंय किंवा करिअरमध्ये स्थिरस्थावर झालोय म्हणून करायचंय, या गोष्टी लग्नासाठी पुरेशा नाहीत. लग्नामध्ये सहचर्य, प्रेम, शारीरिक गरज या मूलभूत गरजा आहेत. बरेचदा मुलांना ही कल्पना नसते की लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. केवळ एकमेकांकडून अपेक्षा असता कामा नयेत. याची जाणीव आम्ही करून देतो. लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचं नाते नाही. तर त्यात कुटुंबदेखील येते. वयाच्या वेगळ्या टप्प्यावर गेल्यावर तुमचा प्राधान्यक्रम बदलतो. त्यातून मग प्रेम संपले असे वाटते. पण ते तसं नसतं. हे देखील समजावून सांगितले जाते. लग्नामधून एकमेकांना आनंद, सुख मिळाले पाहिजे. त्यासाठी हे समुपदेशन आवश्यक आहे.” - दीपा राक्षे, मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. त्यातून एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा कळतात आणि लग्नानंतर उदभवणाऱ्या समस्या टाळता येतात. एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत याची स्पष्टता लग्नापूर्वी मनमोकळेपणाने झाली तर घटस्फोट निश्चितच टाळता येतील.”

- अँड. वैशाली चांदणे, अध्यक्ष फँमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन