शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लग्न करायचंय...मग ‘विवाहपूर्व’ मार्गदर्शन घ्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

नम्रता फडणीस पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर ...

नम्रता फडणीस

पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले. एका सुंदर नात्याची परिणिती घटस्फोटापर्यंत जात असेल तर नक्की काय चुकतंय याचा विचार करायला हवा आणि हे टाळायचे असेल तर तरुण-तरुणींनी विवाहपूर्व समुपदेशन करुन घेतले पाहिजे, असे सांगितले जात आहे.

समुपदेशनाद्वारे एकमेकांचे स्वभाव, विशिष्ट प्रसंग किंवा परिस्थितीमध्ये दोघांची वैचारिकता, एकमेकांबरोबर खरोखर संसार करायचा आहे का, कशा प्रकारे संसार सुरळीत होऊ शकेल हे जाणून घेता येईल. दोघेही परस्परपूरक नसतील तर मग लग्नाचे पाऊल उचलायचे का याचाही पुनर्विचार विवाहेच्छुक तरुण-तरुणींना करता येईल. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज असल्याचे विवाह समुपदेशक सांगतात.

“केवळ टाळेबंदीमध्येच नव्हे तर अलीकडच्या दोन दशकांत घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढत आले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्तिकेंद्रित’ समाजरचनेकडे चाललो आहोत. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. समोरच्या माणसाला स्वीकारण्याची आणि सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. लग्न का नि कशासाठी करायचं? त्यासाठी दोघांनी काय करायला हवं हे तरूण-तरूणींना शांतपणे नीट समजून सांगायला हवे,” असे लीना कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये दरवर्षी वाढ

गोव्याच्या कायदेमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता व्यक्त करीत विवाह नोंदणीच्या वेळी जोडप्यांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुण्यात गेल्या अडीच वर्षात परस्पर संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल झाले आहेत. विवाहपूर्व समुपदेशन हाच वाढते घटस्फोट रोखण्यावरील उत्तम उपाय असल्याचे विवाह समुपदेशकांना वाटते.

चौकट

लग्न कशासाठी हेच कळत नाही

“तरुणांमध्ये लग्न का करायचे याबाबत बरेचदा अस्पष्टता दिसून येते. वय झालंय किंवा घरचे म्हणतात म्हणून लग्न करायचंय किंवा करिअरमध्ये स्थिरस्थावर झालोय म्हणून करायचंय, या गोष्टी लग्नासाठी पुरेशा नाहीत. लग्नामध्ये सहचर्य, प्रेम, शारीरिक गरज या मूलभूत गरजा आहेत. बरेचदा मुलांना ही कल्पना नसते की लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. केवळ एकमेकांकडून अपेक्षा असता कामा नयेत. याची जाणीव आम्ही करून देतो. लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचं नाते नाही. तर त्यात कुटुंबदेखील येते. वयाच्या वेगळ्या टप्प्यावर गेल्यावर तुमचा प्राधान्यक्रम बदलतो. त्यातून मग प्रेम संपले असे वाटते. पण ते तसं नसतं. हे देखील समजावून सांगितले जाते. लग्नामधून एकमेकांना आनंद, सुख मिळाले पाहिजे. त्यासाठी हे समुपदेशन आवश्यक आहे.” - दीपा राक्षे, मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. त्यातून एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा कळतात आणि लग्नानंतर उदभवणाऱ्या समस्या टाळता येतात. एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत याची स्पष्टता लग्नापूर्वी मनमोकळेपणाने झाली तर घटस्फोट निश्चितच टाळता येतील.”

- अँड. वैशाली चांदणे, अध्यक्ष फँमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन