शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

लग्न करायचंय...मग ‘विवाहपूर्व’ मार्गदर्शन घ्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

नम्रता फडणीस पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर ...

नम्रता फडणीस

पुणे : टाळेबंदीच्या काळात शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळविण्यासाठी ११९२ दावे दाखल झाले. त्यापैकी १००४ दाव्यांत परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले. एका सुंदर नात्याची परिणिती घटस्फोटापर्यंत जात असेल तर नक्की काय चुकतंय याचा विचार करायला हवा आणि हे टाळायचे असेल तर तरुण-तरुणींनी विवाहपूर्व समुपदेशन करुन घेतले पाहिजे, असे सांगितले जात आहे.

समुपदेशनाद्वारे एकमेकांचे स्वभाव, विशिष्ट प्रसंग किंवा परिस्थितीमध्ये दोघांची वैचारिकता, एकमेकांबरोबर खरोखर संसार करायचा आहे का, कशा प्रकारे संसार सुरळीत होऊ शकेल हे जाणून घेता येईल. दोघेही परस्परपूरक नसतील तर मग लग्नाचे पाऊल उचलायचे का याचाही पुनर्विचार विवाहेच्छुक तरुण-तरुणींना करता येईल. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज असल्याचे विवाह समुपदेशक सांगतात.

“केवळ टाळेबंदीमध्येच नव्हे तर अलीकडच्या दोन दशकांत घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढत आले आहे. आपण ‘कुटुंबकेंद्रित’ रचनेकडून ‘व्यक्तिकेंद्रित’ समाजरचनेकडे चाललो आहोत. जो प्रवास ‘आम्ही’कडे व्हायला हवा होता तो ‘मी’पणाकडे येऊन ठेपला आहे. समोरच्या माणसाला स्वीकारण्याची आणि सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. लग्न का नि कशासाठी करायचं? त्यासाठी दोघांनी काय करायला हवं हे तरूण-तरूणींना शांतपणे नीट समजून सांगायला हवे,” असे लीना कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

घटस्फोटाच्या दाव्यांमध्ये दरवर्षी वाढ

गोव्याच्या कायदेमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता व्यक्त करीत विवाह नोंदणीच्या वेळी जोडप्यांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुण्यात गेल्या अडीच वर्षात परस्पर संमतीने घटस्फोट मिळविण्यासाठी ३ हजार ३५२ दावे दाखल झाले आहेत. विवाहपूर्व समुपदेशन हाच वाढते घटस्फोट रोखण्यावरील उत्तम उपाय असल्याचे विवाह समुपदेशकांना वाटते.

चौकट

लग्न कशासाठी हेच कळत नाही

“तरुणांमध्ये लग्न का करायचे याबाबत बरेचदा अस्पष्टता दिसून येते. वय झालंय किंवा घरचे म्हणतात म्हणून लग्न करायचंय किंवा करिअरमध्ये स्थिरस्थावर झालोय म्हणून करायचंय, या गोष्टी लग्नासाठी पुरेशा नाहीत. लग्नामध्ये सहचर्य, प्रेम, शारीरिक गरज या मूलभूत गरजा आहेत. बरेचदा मुलांना ही कल्पना नसते की लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे. केवळ एकमेकांकडून अपेक्षा असता कामा नयेत. याची जाणीव आम्ही करून देतो. लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचं नाते नाही. तर त्यात कुटुंबदेखील येते. वयाच्या वेगळ्या टप्प्यावर गेल्यावर तुमचा प्राधान्यक्रम बदलतो. त्यातून मग प्रेम संपले असे वाटते. पण ते तसं नसतं. हे देखील समजावून सांगितले जाते. लग्नामधून एकमेकांना आनंद, सुख मिळाले पाहिजे. त्यासाठी हे समुपदेशन आवश्यक आहे.” - दीपा राक्षे, मानसोपचारतज्ज्ञ

चौकट

“विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. त्यातून एकमेकांचे स्वभाव, अपेक्षा कळतात आणि लग्नानंतर उदभवणाऱ्या समस्या टाळता येतात. एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत याची स्पष्टता लग्नापूर्वी मनमोकळेपणाने झाली तर घटस्फोट निश्चितच टाळता येतील.”

- अँड. वैशाली चांदणे, अध्यक्ष फँमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन