शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती!

By admin | Updated: April 25, 2016 02:44 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा देवघर धरणात १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही धरण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. टँकरची मागणी करून दीड महिना झाला तरी अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करा. अन्यथा हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही धरण भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे. भोर तालुक्यात २०१५ मध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून, यामुळे पाण्याचा खांडवा कुरुंजी गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दीड महिना असून, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धरणाचा खांडवा मळे गावापर्यंत आला असून, पाणी गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर गेले आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असून यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. तर दोन मोटारीमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. मात्र आता धरणात पाणीच नसल्याने टँकरशिवाय कोणताच पर्याय नाही. (वार्ताहर)भाटघर धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने माजगाव, हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कांबरे बु., कुरुंजी यांसह अनेक गावांतील विहिरीतील मोटारी बंद पडल्या आहेत. त्यामुळे दुसरी मोटर घेऊन सदरची मोटार विहिरीपासून धरणाच्या पात्रापर्यंत एक ते दोन किलोमीटरवर पाण्यात टाकून ते पाणी विहिरीत सोडून उचलले जात आहे. नीरा देवघर धरण भागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बु., निवंगण, धानवली, शिरवली हि.मा., चौधरीवस्ती, कुडली खुर्द, कुडली बु., दुर्गाडी तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाई वस्ती, सुईरमाळ, कारुंगण, शिरगाव, शिळिंब, अशिंपी, उंबार्डेवाडी यांसह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.