शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वाल्हे, वीर रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, रस्त्याला तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST

पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे गावामधून वीर, तसेच हरणी, पिंगोरी, वाल्हे येथील आद्य रामायणकार महर्षि वाल्मीकी ॠषींची संजीवनी समाधी ...

पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे गावामधून वीर, तसेच हरणी, पिंगोरी, वाल्हे येथील आद्य रामायणकार महर्षि वाल्मीकी ॠषींची संजीवनी समाधी मंदिर, वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, वाल्हे येथील श्री भैरवनाथ मंदिर आदी धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, तसेच साईड पट्टीच पूर्ण पणे खचल्यामुळे रस्त्याची उंची जमीनपेक्षा अधिक होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने , साठलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक छोटे- मोठे अपघात होत आहेत.

महाराष्ट्र बँकेच्या समोरील रस्ता ते वीर फाटा या ठिकाणच्या रस्त्यावर डांबर व खडी राहिली नसून अनेक मोठ- मोठे खड्डे पडून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

कोरोना संकटामुळे सर्वच मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत. दर महिन्यातील अमावास्या दिवशी श्रीक्षेत्र वीर येथील म्हस्कोबा मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या भाविकांना याच रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढत देवदर्शनासाठी जावे लागले असते.

पिंगोरी गाव सैनिकांचे गाव आहे. येथील प्रत्येक घरामधील एक जण सैनिक आहे. त्यांनाही आपल्या गावामध्ये पोचण्यासाठी याच खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो.

वाल्हे गावापासून पिंगोरी व पिंगोरी ते साकुर्डे हा रस्ता देखील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे येथील शहीद शंकर चौकापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत दयनीय झाला असल्याने, सैनिकांच्या गावाला जाण्यासाठी आगोदर याच खडतर रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. तसेच आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ॠषींची संजीवनी समाधी मंदिराकडे याच खडतर मार्गावरून जावे लागते.

--

१५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिंगोरी गावातील ग्रामस्थानी निवडणुकीवर बहिष्कार टाकत, हा रस्ता लवकर झाला नाही तर येणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल, असे जाहीर करण्यात आले. यानंतर वाल्हे ते पिंगोरी रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू करण्यात आले होते. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हेत जाणारा रस्त्याची दुरुस्ती मात्र अर्धवट राहिली त्यामुळे रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन करावे लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

--

फोटो क्रमांक : १७ वाल्हे रस्ता

फोटोओळ- वाल्हे (ता.पुरंदर) येथील वाल्हे वीर रस्तावर पडलेले मोठे खड्डे व त्या खड्ड्यात पावसाचे साचून राहत असलेले पाणी.

170721\17pun_1_17072021_6.jpg

फोटो क्रमांक : १७ वाल्हे रस्ता  फोटोओळ- वाल्हे (ता.पुरंदर) येथील वाल्हे वीर रस्तावर पडलेले मोठे खड्डे व त्या खड्ड्यात पावसाचे साचून राहत असलेले पाणी.