शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

‘वकिली व्यवसायातील नीतिमत्ता हरवली’

By admin | Updated: December 21, 2015 00:37 IST

न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे.

बारामती : न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे. अन्याय दूर करण्याचे कर्तव्य स्वीकारण्याऐवजी युक्तीवादातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न दिसून येतो, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. बारामती येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित बारामती, इंदापूर, दौंड वकील परिषदेत ते बोलत होते. धर्माधिकारी म्हणाले, समाजात डॉक्टर, वकिलांना देवासमान मानले जाते. देवत्वाचे स्थान दिले जाते. मात्र,अशा वेळी वकिली व्यवसाय म्हणून अंगीकारला, का त्याचा धंदा केला. याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानात उद्योगधंदा करण्याचे स्वातंत्र्य आहे. व्यवसाय करताना नीतिमत्ता देखील राखणे आवश्यक आहे. त्यातून व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते. त्यासोबत राष्ट्राची मानदेखील उंचावते. मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्यही महत्त्वाचे आहे. आता मात्र नीतिमत्तेला दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यासाठी गुणवत्ता आणि नीतिमत्तेचा खरा अर्थ समजावून घेतला पाहिजे. खरोखर अन्याय झालेल्या सर्वसामान्यांनान्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तर सर्वसामान्यांवर अन्याय सहन करण्याची वेळ येणार नाही. त्याचवेळी लोकशाही अस्तित्वात येईल. बुद्धी कौशल्यासाठी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले. आपण कर्तव्यनिष्ठ, गुणवान असता तर मला हे बोलण्याची वेळ आली नसती, असे देखील न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी या वेळी नमूद केले. या वेळी बोलताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय टिपसे म्हणाले, वकील परिषदांची आवश्यकता आहे. या निमित्ताने कायद्यांची चर्चा होते. त्यातून महत्त्वाचे विश्लेषण पुढे येते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल करण्यात आला. अशा दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडल्या नव्हत्या. मात्र, सामाजिक दबाव, जनक्षोभानंतर कायद्यात बदल झाले. मात्र, सामाजिक जबाबदाऱ्यांची देखील जाणीव समाजघटकांना झाली पाहिजे. तसेच, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. या वेळी अ‍ॅड. हरिष तावरे यांनी स्वागत केले. बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. गुलाबराव गावडे यांनी आभार मानले. या वेळी सुमंत कोल्हे, जिल्हा सत्रन्यायाधीश राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. अ‍ॅड. रमेश कोकरे, राजेंद्र काळे, हेमचंद्र मोरे, भगवानराव खारतोडे, पंढरीनाथ नाळे यांच्यासह बारामती, दौंड, इंदापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.