शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

‘वकिली व्यवसायातील नीतिमत्ता हरवली’

By admin | Updated: December 21, 2015 00:37 IST

न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे.

बारामती : न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे. अन्याय दूर करण्याचे कर्तव्य स्वीकारण्याऐवजी युक्तीवादातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न दिसून येतो, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. बारामती येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित बारामती, इंदापूर, दौंड वकील परिषदेत ते बोलत होते. धर्माधिकारी म्हणाले, समाजात डॉक्टर, वकिलांना देवासमान मानले जाते. देवत्वाचे स्थान दिले जाते. मात्र,अशा वेळी वकिली व्यवसाय म्हणून अंगीकारला, का त्याचा धंदा केला. याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानात उद्योगधंदा करण्याचे स्वातंत्र्य आहे. व्यवसाय करताना नीतिमत्ता देखील राखणे आवश्यक आहे. त्यातून व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते. त्यासोबत राष्ट्राची मानदेखील उंचावते. मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्यही महत्त्वाचे आहे. आता मात्र नीतिमत्तेला दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यासाठी गुणवत्ता आणि नीतिमत्तेचा खरा अर्थ समजावून घेतला पाहिजे. खरोखर अन्याय झालेल्या सर्वसामान्यांनान्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तर सर्वसामान्यांवर अन्याय सहन करण्याची वेळ येणार नाही. त्याचवेळी लोकशाही अस्तित्वात येईल. बुद्धी कौशल्यासाठी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले. आपण कर्तव्यनिष्ठ, गुणवान असता तर मला हे बोलण्याची वेळ आली नसती, असे देखील न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी या वेळी नमूद केले. या वेळी बोलताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय टिपसे म्हणाले, वकील परिषदांची आवश्यकता आहे. या निमित्ताने कायद्यांची चर्चा होते. त्यातून महत्त्वाचे विश्लेषण पुढे येते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल करण्यात आला. अशा दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडल्या नव्हत्या. मात्र, सामाजिक दबाव, जनक्षोभानंतर कायद्यात बदल झाले. मात्र, सामाजिक जबाबदाऱ्यांची देखील जाणीव समाजघटकांना झाली पाहिजे. तसेच, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. या वेळी अ‍ॅड. हरिष तावरे यांनी स्वागत केले. बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. गुलाबराव गावडे यांनी आभार मानले. या वेळी सुमंत कोल्हे, जिल्हा सत्रन्यायाधीश राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. अ‍ॅड. रमेश कोकरे, राजेंद्र काळे, हेमचंद्र मोरे, भगवानराव खारतोडे, पंढरीनाथ नाळे यांच्यासह बारामती, दौंड, इंदापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.