शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आठशे ते हजार हेक्टर शेतीक्षेत्राला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 28, 2017 03:45 IST

सध्या नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २२ मार्च रोजी सुरू झाले आहे. हे उन्हाळी आवर्तन ४५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक होते. ४५ दिवसांत नीरा

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : सध्या नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २२ मार्च रोजी सुरू झाले आहे. हे उन्हाळी आवर्तन ४५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक होते. ४५ दिवसांत नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन पूर्ण होण्यासाठी ४ टीएमसी पाण्याची गरज भासते. या आर्वतनाला ६५ दिवस पूर्ण झाले आहेत. ६ टीएमसी पाणी संपले तरीदेखील इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच आहे.पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२, ४३ व ४६ वरील आठशे ते हजार हेक्टर शेती भिजायची राहिली आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने या तीनही वितरिकेवरील शेतीला पाणी देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाल करावी. पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी दिला आहे.वीर व भाटघर धरणातून शेतीसाठी पाणी निरा डावा कालव्यात सोडण्यात येते. निरा डावा कालवा हा पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीला वरदान ठरला आहे. या तिनही तालुक्यातील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. पुर्वी याच कालव्यातून शेतीला महिन्याला आवर्तन सुटत होते. अलीकडील काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व धरणात साठलेला गाळ यामुळे धरणसाखळीत पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी अलीकडील काळात महिन्याचे आवर्तन दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. कारण या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नीरा डावा कालवा सायफनच्या जाळ्यात अडकला आहे. ‘धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली आहे. अशातच सध्या २२ मार्च रोजी सुरू झालेले उन्हाळी आर्वतन हे ४५ दिवसांत तसेच ४ टीएमसी पाण्यात पूर्ण व्हायला हवे होते. ६५ दिवसांत ६ टीएमसी पाणी संपले. तरीदेखील आर्वतन पूर्ण झाले नाही. या आर्वतनात २ टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला. तरी देखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आठशे ते हजार हेक्टर शेतीला पाणी मिळाले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. शेतीला पाणी मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. या आर्वतनातील ६ टीएमसी पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी दिला आहे. निरा डावा कालव्यावर निंबोडी (ता. इंदापूर) ते अंथुर्णे (ता. इंदापूर)या अंतरात ५० शेतकऱ्यांची पाणी पुरवठा संस्थामार्फत पाणी उचलायची परवानगी घेतली आहे. परंतु याच अंतरात कालव्यात अनधिकृत ५०० ते ६०० पाईप टाकून सायफनद्वारे पाणी चोरी होत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको कुरवली येथील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्यावाचून जळून गेलेली आहेत. जलसंपदा मंत्री यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही पूर्ण क्षमतेने टेलला पाणी विसर्ग न केल्याने रविवारी (दि.२८ रोजी) सकाळी १० वाजता सणसर येथे रास्ता रोको केला जाणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.मागील दोन दिवसांपूर्वी बारामती-इंदापूर राज्यमार्ग रोखून आंदोलन केल्यावर पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यानंतर आधिकाऱ्यांनी या वितरिकांना जास्त दाबाने पाणी सोडले. परंतु वितरिका क्र. ४३ ला ७५० क्युसेस पाण्याची मागणी असून त्यातील फक्त ३०० क्युसेस पाणी या वितरिकेला मिळाले आहे. या वितरिकेला सध्या ४० क्युसक्ेसने विसर्ग सुरू आहे. जर या वितरिकेवरील शेतीला पाणी देण्यासाठी दहा दिवस पाणी या वितरिकेला मिळणे गरजेचे आहे. तसेच वितरीका क्र. ४६ ला १००० क्युसेसची मागणी असताना फक्त ३५० ते ४०० क्युसेक्स पाणी मिळाले आहे. वितरिकेला सध्या ४५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. या वितरिकेवरील शेतीला पाणी द्यायचे असल्यास बारा ते चौदा दिवस पाणी या वितरीकेंना दयावे लागणार आहे.शिरूर तालुक्यातील तांदळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत १३.७७, साडेअकरा वाजेपर्यत ३५.६४, दीड वाजेपर्यत ६१.१९, चार वाजेपर्यत ७७. ४२ टक्के तर सायकाळी साडेसहा वाजेपर्यत ९०.७४ टक्के मतदान झाले. पुरंदर तालुक्यातील सिंगापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत २८.०८, साडेअकरा वाजेपर्यत ५२.४९, दीड वाजेपर्यत ७१.२७, चार वाजेपर्यत ८०.३९ टक्के तर सायकांळी साडेसहा वाजेपर्यत ९१.२५ टक्के मतदान झाले. या ग्रामपंचातींच्या पोटनिवडणुकीत २६ हजार ३६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात १२ हजार ७१८ महिला तर १३ हजार ६४३ पुरुष मतदारांचा समावेश आहे.