शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

आठशे ते हजार हेक्टर शेतीक्षेत्राला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 28, 2017 03:45 IST

सध्या नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २२ मार्च रोजी सुरू झाले आहे. हे उन्हाळी आवर्तन ४५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक होते. ४५ दिवसांत नीरा

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : सध्या नीरा डावा कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २२ मार्च रोजी सुरू झाले आहे. हे उन्हाळी आवर्तन ४५ दिवसांत पूर्ण होणे आवश्यक होते. ४५ दिवसांत नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन पूर्ण होण्यासाठी ४ टीएमसी पाण्याची गरज भासते. या आर्वतनाला ६५ दिवस पूर्ण झाले आहेत. ६ टीएमसी पाणी संपले तरीदेखील इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच आहे.पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२, ४३ व ४६ वरील आठशे ते हजार हेक्टर शेती भिजायची राहिली आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने या तीनही वितरिकेवरील शेतीला पाणी देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाल करावी. पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी दिला आहे.वीर व भाटघर धरणातून शेतीसाठी पाणी निरा डावा कालव्यात सोडण्यात येते. निरा डावा कालवा हा पुरंदर, बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतीला वरदान ठरला आहे. या तिनही तालुक्यातील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. पुर्वी याच कालव्यातून शेतीला महिन्याला आवर्तन सुटत होते. अलीकडील काळात पावसाचे कमी झालेले प्रमाण व धरणात साठलेला गाळ यामुळे धरणसाखळीत पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी अलीकडील काळात महिन्याचे आवर्तन दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. कारण या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नीरा डावा कालवा सायफनच्या जाळ्यात अडकला आहे. ‘धरलं तर चावतयं अन् सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली आहे. अशातच सध्या २२ मार्च रोजी सुरू झालेले उन्हाळी आर्वतन हे ४५ दिवसांत तसेच ४ टीएमसी पाण्यात पूर्ण व्हायला हवे होते. ६५ दिवसांत ६ टीएमसी पाणी संपले. तरीदेखील आर्वतन पूर्ण झाले नाही. या आर्वतनात २ टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला. तरी देखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आठशे ते हजार हेक्टर शेतीला पाणी मिळाले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. शेतीला पाणी मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. या आर्वतनातील ६ टीएमसी पाण्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या वितरिकेवरील शेतकऱ्यांनी दिला आहे. निरा डावा कालव्यावर निंबोडी (ता. इंदापूर) ते अंथुर्णे (ता. इंदापूर)या अंतरात ५० शेतकऱ्यांची पाणी पुरवठा संस्थामार्फत पाणी उचलायची परवानगी घेतली आहे. परंतु याच अंतरात कालव्यात अनधिकृत ५०० ते ६०० पाईप टाकून सायफनद्वारे पाणी चोरी होत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको कुरवली येथील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्यावाचून जळून गेलेली आहेत. जलसंपदा मंत्री यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही पूर्ण क्षमतेने टेलला पाणी विसर्ग न केल्याने रविवारी (दि.२८ रोजी) सकाळी १० वाजता सणसर येथे रास्ता रोको केला जाणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.मागील दोन दिवसांपूर्वी बारामती-इंदापूर राज्यमार्ग रोखून आंदोलन केल्यावर पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यानंतर आधिकाऱ्यांनी या वितरिकांना जास्त दाबाने पाणी सोडले. परंतु वितरिका क्र. ४३ ला ७५० क्युसेस पाण्याची मागणी असून त्यातील फक्त ३०० क्युसेस पाणी या वितरिकेला मिळाले आहे. या वितरिकेला सध्या ४० क्युसक्ेसने विसर्ग सुरू आहे. जर या वितरिकेवरील शेतीला पाणी देण्यासाठी दहा दिवस पाणी या वितरिकेला मिळणे गरजेचे आहे. तसेच वितरीका क्र. ४६ ला १००० क्युसेसची मागणी असताना फक्त ३५० ते ४०० क्युसेक्स पाणी मिळाले आहे. वितरिकेला सध्या ४५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. या वितरिकेवरील शेतीला पाणी द्यायचे असल्यास बारा ते चौदा दिवस पाणी या वितरीकेंना दयावे लागणार आहे.शिरूर तालुक्यातील तांदळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत १३.७७, साडेअकरा वाजेपर्यत ३५.६४, दीड वाजेपर्यत ६१.१९, चार वाजेपर्यत ७७. ४२ टक्के तर सायकाळी साडेसहा वाजेपर्यत ९०.७४ टक्के मतदान झाले. पुरंदर तालुक्यातील सिंगापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत २८.०८, साडेअकरा वाजेपर्यत ५२.४९, दीड वाजेपर्यत ७१.२७, चार वाजेपर्यत ८०.३९ टक्के तर सायकांळी साडेसहा वाजेपर्यत ९१.२५ टक्के मतदान झाले. या ग्रामपंचातींच्या पोटनिवडणुकीत २६ हजार ३६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात १२ हजार ७१८ महिला तर १३ हजार ६४३ पुरुष मतदारांचा समावेश आहे.