शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

आदिवासी भागाला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 29, 2017 03:47 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या

डिंभे: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन पुणे व नगर जिल्ह्यातील भाग सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु प्रकल्पासाठी जमिनी देऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे भूमिपुत्र मात्र अजूनही डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली अनेक पुनर्वसित गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवा आहे. काही कुटुंबे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या प्रकल्पामुळे देशोधडीला लागलेल्यांना आपल्या पुढील पिढीला तरी एक ना एक दिवस डिंभे धरणाचे पाणी चाखावयास मिळेल, या आशेवर जगत आहे. मात्र चार दशके सरली अजून तरी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. डोंगराच्या तळाशी पाणी दिसत आहे. मात्र त्याचा जीवनात उपयोग होत नसल्याने या भागातील जनता कासावीस झाली आहे. धरण प्रकल्प उभा राहिल्यापासून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अजून तरी या मागणीला मूर्त रूप आले नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभेच्या सिंचनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ््यात हजारो मिमी पाऊस पडतो. या पाण्याच्या जोरावर डिंभे बुद्रुक येथे सन १९७२ मध्ये घोड नदीवर सुमारे ८५२ मीटर लांबीचे व ७२ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. १३.५० टीएमसीएवढे पाणी साठवणक्षमता असणाऱ्या या धरणामुळे नगर व पुणे जिल्हयातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ११६ किमी लांब असणाऱ्या उजव्या कालव्याद्वारे आंबेगाव व शिरूर तालुक्यातून अनुक्रमे ८६६१ व ६९०७ सिंचनक्षेत्र प्रस्तावित झाले आहे. या धरणासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, वचपे, कळंबई, फुलवडे, बोरघर, माळीण, अडिवरे, पंचाळे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी आदी आदिवासी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन धरणाच्या पाण्यात बुडाली. या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे बेरोजगार होऊन कायमची निराधार झाली आहेत.डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. तर मग आमच्याच हक्काचे पाणी अम्हाला का मिळू नये? वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भुमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आसल्याने शेतकरीवर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे. (वार्ताहर)