शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागाला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 29, 2017 03:47 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या

डिंभे: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन पुणे व नगर जिल्ह्यातील भाग सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु प्रकल्पासाठी जमिनी देऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे भूमिपुत्र मात्र अजूनही डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली अनेक पुनर्वसित गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवा आहे. काही कुटुंबे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या प्रकल्पामुळे देशोधडीला लागलेल्यांना आपल्या पुढील पिढीला तरी एक ना एक दिवस डिंभे धरणाचे पाणी चाखावयास मिळेल, या आशेवर जगत आहे. मात्र चार दशके सरली अजून तरी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. डोंगराच्या तळाशी पाणी दिसत आहे. मात्र त्याचा जीवनात उपयोग होत नसल्याने या भागातील जनता कासावीस झाली आहे. धरण प्रकल्प उभा राहिल्यापासून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अजून तरी या मागणीला मूर्त रूप आले नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभेच्या सिंचनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ््यात हजारो मिमी पाऊस पडतो. या पाण्याच्या जोरावर डिंभे बुद्रुक येथे सन १९७२ मध्ये घोड नदीवर सुमारे ८५२ मीटर लांबीचे व ७२ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. १३.५० टीएमसीएवढे पाणी साठवणक्षमता असणाऱ्या या धरणामुळे नगर व पुणे जिल्हयातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ११६ किमी लांब असणाऱ्या उजव्या कालव्याद्वारे आंबेगाव व शिरूर तालुक्यातून अनुक्रमे ८६६१ व ६९०७ सिंचनक्षेत्र प्रस्तावित झाले आहे. या धरणासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, वचपे, कळंबई, फुलवडे, बोरघर, माळीण, अडिवरे, पंचाळे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी आदी आदिवासी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन धरणाच्या पाण्यात बुडाली. या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे बेरोजगार होऊन कायमची निराधार झाली आहेत.डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. तर मग आमच्याच हक्काचे पाणी अम्हाला का मिळू नये? वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भुमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आसल्याने शेतकरीवर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे. (वार्ताहर)