शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

आदिवासी भागाला पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: April 29, 2017 03:47 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या

डिंभे: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे येथे सुमारे साडेतेरा टीएमसीचा डिंभे धरण प्रकल्प उभा राहिला. यामुळे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन पुणे व नगर जिल्ह्यातील भाग सुजलाम् सुफलाम् झाला. परंतु प्रकल्पासाठी जमिनी देऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे भूमिपुत्र मात्र अजूनही डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली अनेक पुनर्वसित गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवा आहे. काही कुटुंबे अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून या प्रकल्पामुळे देशोधडीला लागलेल्यांना आपल्या पुढील पिढीला तरी एक ना एक दिवस डिंभे धरणाचे पाणी चाखावयास मिळेल, या आशेवर जगत आहे. मात्र चार दशके सरली अजून तरी त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही. डोंगराच्या तळाशी पाणी दिसत आहे. मात्र त्याचा जीवनात उपयोग होत नसल्याने या भागातील जनता कासावीस झाली आहे. धरण प्रकल्प उभा राहिल्यापासून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभे धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र अजून तरी या मागणीला मूर्त रूप आले नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागाला डिंभेच्या सिंचनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ््यात हजारो मिमी पाऊस पडतो. या पाण्याच्या जोरावर डिंभे बुद्रुक येथे सन १९७२ मध्ये घोड नदीवर सुमारे ८५२ मीटर लांबीचे व ७२ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. १३.५० टीएमसीएवढे पाणी साठवणक्षमता असणाऱ्या या धरणामुळे नगर व पुणे जिल्हयातील सुमारे ७४४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ११६ किमी लांब असणाऱ्या उजव्या कालव्याद्वारे आंबेगाव व शिरूर तालुक्यातून अनुक्रमे ८६६१ व ६९०७ सिंचनक्षेत्र प्रस्तावित झाले आहे. या धरणासाठी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आंबेगाव, वचपे, कळंबई, फुलवडे, बोरघर, माळीण, अडिवरे, पंचाळे, असाणे, कोकणेवाडी, कोलतावडे, बेंढारवाडी, पाटण, महाळुंगे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द साकेरी, पिंपरी आदी आदिवासी गावे पूर्णत: व अंशत: बाधित होऊन धरणाच्या पाण्यात बुडाली. या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबे बेरोजगार होऊन कायमची निराधार झाली आहेत.डिंभे धरणाचे पाणी विनासायास इतर तालुक्यांना मिळते. तर मग आमच्याच हक्काचे पाणी अम्हाला का मिळू नये? वर्षानुवर्षे मागणी करूनही या भागातील भुमिपुत्रांना डिंभे धरणाच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आसल्याने शेतकरीवर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे. (वार्ताहर)