शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘वाघोली ते लोणी कंद’ सात किलोमीटरचा दुमजली पूल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते लोणी कंद मार्गावर सात किलोमीटरचा दुमजली पूल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते लोणी कंद मार्गावर सात किलोमीटरचा दुमजली पूल बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या पुलाचे आरेखन पूर्ण झाले असून यासाठी वेगळे भूसंपादन करण्याची गरज नाही. त्यामुळे सहा महिन्यांत काम चालू होईल, असे गडकरी म्हणाले.

पुणे-नगर या रस्त्याप्रमाणेच पुढे औरंगाबादपर्यंतचा रस्ताही ‘डायरेक्ट अॅक्सेस रोड’ केला जाणार आहे. हा सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असल्याचे गडकरी यांनी सांगितले. शनिवारी (दि. १३) चांदणी चौकातील रखडलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

गडकरी म्हणाले की, दुमजली पूल झाल्यानंतर वाघोली ते लोणी कंद या मार्गावर सोळा मार्गिकांमधून (लेन) वाहतूक सुरु होईल. यामुळे वाहतूक वेगाने पुढे सरकेल. या पुलावरील सर्वात वरचा मार्ग सहा ‘लेन’चा, मधला मार्ग चार ‘लेन’चा, तर जमिनीवरचा मार्ग आताप्रमाणेच चार ‘लेन’चा असणार आहे. पुणे-नगर या रस्त्याप्रमाणेच नगर-औरंगाबाद या मार्गाचेही डायरेक्ट अॅक्सेस डिझाईन करण्याची सूचना केली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील ५४ किलोमीटरच्या महामार्गाला गती दिली आहे. यासाठी सहाशे कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच काम चालू होईल, असेही ते म्हणाले.

चौकट

सातारा रस्त्याचे काम मार्चमध्ये होणार पूर्ण

“पुणे-सातारा रस्त्यावरील चारपैकी तीन पुलांचे काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित रखडलेली काम येत्या मार्चअखेर पूर्ण होतील,” असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बँक जबाबदार होती. त्यांनी करारभंग केल्याने कंत्राटदाराला पैसे दिले गेले नाहीत आणि काम रखडले. या बँकेवर कारवाई करण्याचे पत्र मी संबंधितांना दिले आहे. तसेच तूर्तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैसे देऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या मार्चअखेर ही कामे पूर्ण केली जातील, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

चौकट

भक्तिमार्गासाठी बारा हजार कोटी

आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गांवरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास माझे प्राधान्य आहे. येत्या दीड वर्षात बारा हजार कोटी रुपये खर्च करुन या दोन्ही महामार्गांची कामे पूर्ण केली जातील. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि खासदार गिरीश बापट यांची वेळ घेऊन भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्याची सूचना केली आहे. हे दोन्ही मार्ग केवळ महामार्ग न होता ‘भक्तिमार्ग’ बनावेत असा प्रयत्न आहे. या दृष्टीने महामार्गावर संतवचने असतील, संत ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या अभंगांमध्ये उल्लेखलेल्या वृक्षवल्लींची लागवड महामार्गाच्या बाजूने केली जाईल. अनवाणी चालताना वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत यासाठी काही करता येईल का, असाही प्रयत्न केला जातो आहे.