शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विनाकाम तरीही वेतन

By admin | Updated: June 12, 2014 05:09 IST

लाच घेतल्याप्रकरणी, आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात फौजदारी केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर मनपा प्रशासन निलंबन कारवाई करते.

पिंपरी : लाच घेतल्याप्रकरणी, आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात फौजदारी केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर मनपा प्रशासन निलंबन कारवाई करते. वर्षभरात १९ जणांवर ही कारवाई केली. त्यांपैकी १८ जणांना निलंबन काळातही ७५ टक्के वेतन मिळते आहे. एकाला मात्र ५० टक्के वेतन दिले जात आहे. संबंधित प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत त्यांना वेतन देण्याची तरतूद कायद्यात आहे.महाराष्ट्र नागरी सेवा १९८१ मधील कलम ३८ नुसार शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थामधील सेवेत असणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निलंबन काळात वेतन देण्याची कायद्यात तरतूद आहे. पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा, निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे याबाबत या कायद्यात कर्मचाऱ्यांना निलंबन काळातही विशिष्ट वेतन दिले जाते. यापूर्वी निलंबनानंतर सुरुवातीचे ६ महिने ५० टक्के वेतन, त्यानंतरच्या काळासाठी ७५ टक्के वेतन दिले जात होते. ९ मे २०१३ ला शासनाने नव्याने अधिसूचना काढून त्यात सुधारणा केली. महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील कलम ३८ मध्ये सुधारणा करून निलंबनानंतर ५० टक्के वेतन अदा करण्यासाठी पहिले सहा महिने ऐवजी ३ महिने अवधी असा बदल केला. तसेच त्यानंतर प्रकरणाचा आढावा घेतल्यांनतर परिस्थिती विचारात घेऊन ७५ टक्के वेतन देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे कायद्यात नमूद केले आहे. त्यानुसार निलंबित कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुरुवातीचे तीन महिने गेल्यानंतर प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत काम न करता ७५ टक्के वेतन मिळत राहते. प्रकरणात कर्मचारी, अधिकारी दोषी आढळल्यास, शिक्षा सुनावल्यास सेवेतून काढून टाकले जाते. वेतनापोटी अदा केलेली रक्कम वसूलीचा अधिकार महापालिकेला आहे. दंडात्मक कारवाई करून काहींना रुजू करून घेतले जाते. तसेच कर्मचारी, अधिकारी निर्दोष सुटल्यास निलंबन कारवाई मागे घेऊन पुन्हा सेवेत घेतले जाते. त्यांचा सेवाकाल नियमित करून वेतनातील फरकाची रक्कमसुद्धा संबंधित कर्मचाऱ्याला द्यावी लागते. गेल्या वर्षी एकूण २५ जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यातील सहा जणांना दंडात्मक कारवाई करून, वेतनवाढ रोखून सेवेत सामावून घेतले आहे. (प्रतिनिधी)