शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी' हे आपल्या जगण्याचं सूत्र व्हावं : प्रशांत जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST

पुणे:- भ्रामक विकासाच्या पाठीमागे धावताना आपण निसर्गाची यथेच्छ नासधूस केली आहे. त्याच्याच परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. ...

पुणे:- भ्रामक विकासाच्या पाठीमागे धावताना आपण निसर्गाची यथेच्छ नासधूस केली आहे. त्याच्याच परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. निसर्गाची रचनाच मुळात अशी आहे की, त्यामुळे सगळ्यांचे जीवन फळेल, फुलेल आणि विकसित होईल. परंतु, निसर्गातील इतर संपत्तीवर अधिराज्य गाजविण्याच्या मनुष्यजातीच्या हव्यासापोटी मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' हे आपल्या जगण्याचं सूत्रं व्हावं, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाच्या वतीने देण्यात येणारा वृक्षमित्र पुरस्कार यंदा विठ्ठल उर्फ भाई कात्रे यांना जगताप यांच्या हस्ते रविवारी (दि.३०) प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ५५ वृक्षांची रोपे, अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह, तिरंगी शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका लता राजगुरू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, आर.के. बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो वृक्षांचे रोपण करून त्यांचे जतन करून समाजासमोर भाई कात्रे यांनी घातलेल्या वस्तुपाठाचे आदर्श उदाहरण लोकांपुढे यावे, यासाठी कात्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जगताप म्हणाले की, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर विकास की पर्यावरण अशा व्दिधा मन:स्थितीत मनुष्यप्राणी अडकलेला आहे. परंतु, निसर्गाच्या हातात हात घालून देखील विकास साधता येतो, याची अनेक उदाहरणे प्रगत देशांमध्ये दिसून येतात. निसर्गाचा ऱ्हास होणे, हे मनुष्यजातीच्या समूळ उच्चाटनाकडे असलेली वाटचाल आहे.

भाई कात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल गायकवाड यांनी संयोजन आणि सूत्रसंचालन केले.