शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यात्रेतून येणार का मतदानाला?

By admin | Updated: February 12, 2017 04:50 IST

पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांच्या १० दिवसांच्या यात्रेचा तालुक्यातील पश्चिम भागातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे

गराडे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबामहाराजांच्या १० दिवसांच्या यात्रेचा तालुक्यातील पश्चिम भागातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, प्रचारात उमेदवारांना लोक गावात सापडणे मुश्कील असतानाच यात्रेच्या मुख्य व शेवटच्या मारामारीच्या दिवशीच (दि. २१) मतदान आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची दाट शक्यता आहे.दिवे-गराडे जिल्हा परिषद गटाचा निम्मा भाग व गराडे पंचायत समिती गण या यात्रेला जाणाऱ्या गावांमध्ये समाविष्ट होतो. त्यामध्ये गराडे, भिवरी, चांबळी, बोपगाव, सोमुर्डी, दरेवाडी, वारवडी, थापेवाडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी, पठारवाडी, आस्करवाडी, विठ्ठलवाडी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द या गावांचा समावेश आहे.विशेषत: कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द ही गावे म्हस्कोबामहाराजांच्या मंदिर परिसरातील आहेत. येथील श्रीनाथभक्त मोठ्या संख्येने यात्रेला जातात. प्रामुख्याने २१ फेब्रुवारी या मारामारीच्या दिवशी (लालभडक गुलालाचे शिंपण) या दोन्ही गावांतील ९५ टक्के लोक श्रीक्षेत्र वीरला जातात. त्यामुळे मारामारीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर ते श्रीक्षेत्र कोडीत, असा तब्बल ३५ ते ३८ कि.मी.चा प्रवास करून मतदानाचा हक्क कोण-कोण बजावणार, अशी शंका या भागात चर्चेत आहे. मारामारी दुपारी २ ते ३च्या दरम्यान संपते. मारामारी उरकल्यावर किती श्रीनाथभक्त मतदानस्थळी वेगाने पोहोचून मतदान करणार, याची सर्वपक्षीय उमेदवारांना भीतियुक्त चिंता लागली आहे.यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वत्र चौरंगी व पंचरंगी अटीतटीच्या लढती होत आहेत. त्यामुळे उमेदवार १०० ते ५०० मतांच्याच फरकाने निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातच प्रचारासाठी खूपच कमी अवधी शिल्लक राहिल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ उडत असून, दमछाक होत आहे. त्यातच श्रीक्षेत्र वीर येथील म्हस्कोबामहाराज यात्रेमुळे यात्राकाळात मतदार मतदानाला कसा प्रतिसाद देतात, यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.श्रीक्षेत्र वीर येथे देवाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय यात्रा संपली, असे मानत नाहीत. ते तेथे उपस्थित राहून भक्तिभाव जोपासतात. वीर-कोडीत अंतर मोठे आहे. मारामारी झाल्यानंतर श्रीनाथभक्त मतदानाचा हक्क स्वत:च्या वाहनांनी वेगाने येऊन किती प्रमाणात बजावतात, पक्षाचे कार्यकर्ते व इतर लोक त्यांना कशी मदत करणार, यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे.- निवृत्ती जरांडे, उपसरपंच, कोडीत