शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

एकाच कुटुंबातील मतदारांना वेगवेगळी केंद्रे

By admin | Updated: October 15, 2014 05:13 IST

मतदार यादीतील घोळ निस्तारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर दमदार पाऊले उचलली असली, तरी वास्तवात घोळ संपत नसल्याचे दिसून येते.

पुणे : मतदार यादीतील घोळ निस्तारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर दमदार पाऊले उचलली असली, तरी वास्तवात घोळ संपत नसल्याचे दिसून येते. एकाच घरातील एकाच पत्त्यावर राहणाऱ्या चार मतदारांना तीन वेगवेगळी मतदान केंद्रे देण्याचा आणि ओळखपत्रांवर वेगवेगळे पत्ते छापण्याचा पराक्रम निवडणूक यंत्रणेने केला आहे.डॉ. आनंद कामत (मोहित हाईट्स, आगरवाले कॉलनीजवळ, भवानी पेठ) यांचे मतदान केंद्र मीरा हाउसिंंग सोसायटीतील आनंद पार्क येथे असून, त्यांच्या मुलीसाठी सापिका कॉर्नर येथील महावीर कॉम्प्लेक्स हे केंद्र देण्यात आले आहे. त्यांच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी कासेवाडी येथील कामनगर मित्रमंडळ हे मतदान केंद्र देण्यात आले आहे.कामत यांनी सांगितले, की लोकसभेच्या निवडणुकीत मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याने आम्ही फॉर्म क्रमांक ६ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे ३० जून रोजी भरून दिला होता. हा अर्ज दिल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीमधील अधिकाऱ्याची भेट घेण्यास सांगण्यात आले. मात्र संबंधित अधिकाऱ्याने संगणकाच्या सॉफ्टवेअरवर आमच्या पत्त्याचा आढळ होत नसल्याने जवळच्या पत्त्याचा पर्याय घेण्यास सांगितले, पण त्यास मी नकार दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर या वैचित्र्याबद्दल तक्रार केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.डॉ. कामत यांनी याबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की आम्हा सर्वांचा पत्ता एकच असूनही वेगवेगळी केंद्रे देण्यात आल्याचे तसेच ओळखपत्रांवर वेगवेगळे पत्ते असल्याचे लक्षात आले. आमच्या खऱ्या पत्त्यानुसार आम्हाला भवानी पेठेतील नवीन हिंंद हायस्कूल हे केंद्र असणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)