शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दडपण कमी झाल्यावरच विराटची कामगिरी बहरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST

चंदू बोर्डे : खासदार शरद पवार यांच्याहस्ते पुण्यात सन्मान पुणे : कर्णधारपद आणि आघाडीचा फलंदाज या दोन्ही कठीण जबाबदाऱ्यांमुळेच ...

चंदू बोर्डे : खासदार शरद पवार यांच्याहस्ते पुण्यात सन्मान

पुणे : कर्णधारपद आणि आघाडीचा फलंदाज या दोन्ही कठीण जबाबदाऱ्यांमुळेच विराटची गेल्या काही दिवसांतील कामगिरी खालावली आहे; मात्र दडपण कमी झाल्यावर त्याची कामगिरी नक्की सुधारेल आणि आपल्याला पूर्वीचा विराट कोहली अनुभवता येईल, असे मत माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.

पुणा क्लब येथे मंगळवारी ‘सॅल्युट टू द लिजेंड चंदू बोर्डे’ या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बोर्डे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असे चढ-उतार येतच असतात. त्यामुळे विराटच्या खालावलेल्या कामगिरीमुळे आश्चर्य वाटत नाही. तो भविष्यात भारतीय संघासाठी आणखी मोलाचे योगदान देईल. यावेळी द्वारकानाथ संझगिरी यांनी गप्पांमधून बोर्डे यांचा क्रिकेटमधील जीवनपट उलगडला.

यावेळी बोर्डे यांनी विजय हजारे, नरी काॅन्ट्रँक्टर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विनू मंकड, सदू शिंदे, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा अनेक खेळाडूंच्या आठवणींना उजाळा दिला. १९५८ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर असताना बोर्डे यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. दोन्ही कसोटींमध्ये त्यांची कामगिरी जेमतेम होती. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्यांना संघात स्थान मिळाले नाही. अखेरच्या कसोटीत बोर्डे यांनी पहिल्या डावात शतक (१०९) झळकावले. तर दुसऱ्या डावात ९६ धावांवर ते हीट विकेट झाले. याबाबत बोर्डे म्हणाले की, हूकचा फटका लगावताना पाय स्टंपला लागून बाद झाल्यामुळे शतक हुकले. यावेळी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची दहशत जवळून अनुभवल्याचेही ते म्हणाले.

चंदू बोर्डे म्हणाले की, ऋतुराज गायकवाड उत्तम फलंदाज आहे. काही सामन्यांमधील त्याची फलंदाजी आश्वासक आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. ऋतुराजसारख्या खेळाडूंचीच भारतीय संघाला गरज आहे.

अमिताभ बच्चन अन् राज कपूर

दिल्लीतील कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर बोर्डे यांना अमिताभ बच्चन यांनी उचलले होते. याबाबत खुद्द अमिताभ यांनीच माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईतील सामन्यानंतर राज कपूर यांनी बाेर्डे यांना उचलून घेतले होते; मात्र त्यावेळी हरवलेली बॅट आजपर्यंत मिळाली नसल्याच्या आठवणीला बोर्डे यांनी उजाळा दिला.

बोर्डे यांचे मोलाचे योगदान - शरद पवार

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात चंदू बोर्डे यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्यामुळेच भारताला आतापर्यंत अनेक मोलाचे खेळाडू मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा अध्यक्ष असतानाही कधीही कोणत्याही खेळाडूचे नाव सुचविले नाही. आज अनेक माजी खेळाडूंनी योगदान दिल्यामुळे तळागाळातील खेळाडू पुढे येत आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे, असेही ते म्हणाले.

फोटो - चंदू बोर्डे - १