शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
3
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
4
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
5
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
6
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
7
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
8
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
9
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
10
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
11
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
12
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
13
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
14
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
15
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
16
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
17
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
18
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
19
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
20
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
Daily Top 2Weekly Top 5

दडपण कमी झाल्यावरच विराटची कामगिरी बहरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST

चंदू बोर्डे : खासदार शरद पवार यांच्याहस्ते पुण्यात सन्मान पुणे : कर्णधारपद आणि आघाडीचा फलंदाज या दोन्ही कठीण जबाबदाऱ्यांमुळेच ...

चंदू बोर्डे : खासदार शरद पवार यांच्याहस्ते पुण्यात सन्मान

पुणे : कर्णधारपद आणि आघाडीचा फलंदाज या दोन्ही कठीण जबाबदाऱ्यांमुळेच विराटची गेल्या काही दिवसांतील कामगिरी खालावली आहे; मात्र दडपण कमी झाल्यावर त्याची कामगिरी नक्की सुधारेल आणि आपल्याला पूर्वीचा विराट कोहली अनुभवता येईल, असे मत माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले.

पुणा क्लब येथे मंगळवारी ‘सॅल्युट टू द लिजेंड चंदू बोर्डे’ या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बोर्डे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असे चढ-उतार येतच असतात. त्यामुळे विराटच्या खालावलेल्या कामगिरीमुळे आश्चर्य वाटत नाही. तो भविष्यात भारतीय संघासाठी आणखी मोलाचे योगदान देईल. यावेळी द्वारकानाथ संझगिरी यांनी गप्पांमधून बोर्डे यांचा क्रिकेटमधील जीवनपट उलगडला.

यावेळी बोर्डे यांनी विजय हजारे, नरी काॅन्ट्रँक्टर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विनू मंकड, सदू शिंदे, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा अनेक खेळाडूंच्या आठवणींना उजाळा दिला. १९५८ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर असताना बोर्डे यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. दोन्ही कसोटींमध्ये त्यांची कामगिरी जेमतेम होती. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्यांना संघात स्थान मिळाले नाही. अखेरच्या कसोटीत बोर्डे यांनी पहिल्या डावात शतक (१०९) झळकावले. तर दुसऱ्या डावात ९६ धावांवर ते हीट विकेट झाले. याबाबत बोर्डे म्हणाले की, हूकचा फटका लगावताना पाय स्टंपला लागून बाद झाल्यामुळे शतक हुकले. यावेळी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची दहशत जवळून अनुभवल्याचेही ते म्हणाले.

चंदू बोर्डे म्हणाले की, ऋतुराज गायकवाड उत्तम फलंदाज आहे. काही सामन्यांमधील त्याची फलंदाजी आश्वासक आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. ऋतुराजसारख्या खेळाडूंचीच भारतीय संघाला गरज आहे.

अमिताभ बच्चन अन् राज कपूर

दिल्लीतील कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर बोर्डे यांना अमिताभ बच्चन यांनी उचलले होते. याबाबत खुद्द अमिताभ यांनीच माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईतील सामन्यानंतर राज कपूर यांनी बाेर्डे यांना उचलून घेतले होते; मात्र त्यावेळी हरवलेली बॅट आजपर्यंत मिळाली नसल्याच्या आठवणीला बोर्डे यांनी उजाळा दिला.

बोर्डे यांचे मोलाचे योगदान - शरद पवार

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात चंदू बोर्डे यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्यामुळेच भारताला आतापर्यंत अनेक मोलाचे खेळाडू मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा अध्यक्ष असतानाही कधीही कोणत्याही खेळाडूचे नाव सुचविले नाही. आज अनेक माजी खेळाडूंनी योगदान दिल्यामुळे तळागाळातील खेळाडू पुढे येत आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे, असेही ते म्हणाले.

फोटो - चंदू बोर्डे - १