शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

By admin | Updated: June 28, 2017 04:17 IST

विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या आणि हुंडाबळींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. महागड्या वस्तू, घर, गाड्या घेण्यासाठी आजही विवाहितांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी प्रवेश करणाऱ्या विवाहितांच्या पदरी दु:खाशिवाय काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. ही समस्या सुशिक्षितांच्या घरांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली आहे.  यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता कमी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते.शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि ‘वेल सेटल्ड’ नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी पोखरलेले आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी ‘महिला साह्य कक्ष’ आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो. हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते. तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.संशयी वृत्ती, उत्पन्नावरून होणारी भांडणे, व्यसनाधीनता, पतीकडून होणारी मारहाण, माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या पारंपरिक कारणांशिवाय विवाहबाह्य संबंध, रात्री उशिरापर्यंत महिलांनी काम करणे, पत्नीचे नोकरी करणे मान्य नसणे अशा कारणांमुळेही विवाहितांवर सासरच्यांकडून अत्याचार होत आहेत. पहिले लग्न झालेले असतानाही पुरुष ही माहिती लपवून ठेवून दुसरे लग्न करतात. त्यानंतर महिलांना त्रास सुरू होतो. यातूनही महिलांचा खून, आत्महत्या अशा घटना घडतात.