शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

By admin | Updated: June 28, 2017 04:17 IST

विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या आणि हुंडाबळींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. महागड्या वस्तू, घर, गाड्या घेण्यासाठी आजही विवाहितांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी प्रवेश करणाऱ्या विवाहितांच्या पदरी दु:खाशिवाय काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. ही समस्या सुशिक्षितांच्या घरांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली आहे.  यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता कमी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते.शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि ‘वेल सेटल्ड’ नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी पोखरलेले आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी ‘महिला साह्य कक्ष’ आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो. हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते. तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.संशयी वृत्ती, उत्पन्नावरून होणारी भांडणे, व्यसनाधीनता, पतीकडून होणारी मारहाण, माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या पारंपरिक कारणांशिवाय विवाहबाह्य संबंध, रात्री उशिरापर्यंत महिलांनी काम करणे, पत्नीचे नोकरी करणे मान्य नसणे अशा कारणांमुळेही विवाहितांवर सासरच्यांकडून अत्याचार होत आहेत. पहिले लग्न झालेले असतानाही पुरुष ही माहिती लपवून ठेवून दुसरे लग्न करतात. त्यानंतर महिलांना त्रास सुरू होतो. यातूनही महिलांचा खून, आत्महत्या अशा घटना घडतात.