शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

By admin | Updated: June 28, 2017 04:17 IST

विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या आणि हुंडाबळींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. महागड्या वस्तू, घर, गाड्या घेण्यासाठी आजही विवाहितांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी प्रवेश करणाऱ्या विवाहितांच्या पदरी दु:खाशिवाय काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. ही समस्या सुशिक्षितांच्या घरांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली आहे.  यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता कमी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते.शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि ‘वेल सेटल्ड’ नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी पोखरलेले आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी ‘महिला साह्य कक्ष’ आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो. हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते. तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.संशयी वृत्ती, उत्पन्नावरून होणारी भांडणे, व्यसनाधीनता, पतीकडून होणारी मारहाण, माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या पारंपरिक कारणांशिवाय विवाहबाह्य संबंध, रात्री उशिरापर्यंत महिलांनी काम करणे, पत्नीचे नोकरी करणे मान्य नसणे अशा कारणांमुळेही विवाहितांवर सासरच्यांकडून अत्याचार होत आहेत. पहिले लग्न झालेले असतानाही पुरुष ही माहिती लपवून ठेवून दुसरे लग्न करतात. त्यानंतर महिलांना त्रास सुरू होतो. यातूनही महिलांचा खून, आत्महत्या अशा घटना घडतात.