शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक प्रकल्पांचा गावांना त्रास,प्रशासकीय, राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:35 IST

रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे.

कुरकुंभ : येथील रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे. परिणामी, त्याचे दुष्परिणाम कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील गावांना सोसावे लागले.मात्र, हा त्रास सहन करत असताना अनेक आमदार, खासदार, मंत्री विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी त्यांचा त्रास फक्त पाहण्यापलीकडे काहीच केले नाही, असेच म्हणावे लागेल. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात अनेक सामान्य कामगारांच जीव गेलेला आहे. मात्र, त्याची गंभीर दखल घेण्यात टाळाटाळ करून आपली आर्थिक पोळी शेकून घेण्यापलीकडे आजपर्यंत काहीच झालेले नाही हे वास्तव आज कुरकुंभ येथे आल्यावर माहीत पडते.कुरभावी पिढीसाठी आपण काहीतरी करीत आहोत. या भावनेतून ज्या लोकांनी हा निर्णय घेतला तो निर्णय कदाचित काही अंशीच खरा ठरला कारण जी स्वप्ने दाखवून हा प्रकल्प उभारला गेला त्याची अवस्थादेखील अन्य प्रकाल्पासारखीच झाली. जमिनी गेल्या व वाट्याला आला तो रासायनिक प्रक्रियेचा घातक दुष्परिणाम, हाताला काम नाही व कसायला जमिनीच उरल्या नाहीत. कारण, प्रदूषणाने परिसरातील जवळपास सर्व जमिनी ह्या बाधित झाल्या त्यामुळे शिकलेल्या मुलांना रोजगार मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची दारे झिजवण्या पलीकडे काहीच हाती आले नाही .या रासायनिक प्रकल्पाच्या उभारणीत साठ टक्के रासायनिक व चाळीस टक्के अन्य उद्योगांना प्राधान्य देण्याचे ठरले मात्र रासायनिक प्रकल्पामुळे अन्य उद्योगांनी या औद्योगिक क्षेत्राकडे पाठ फिरवली. परिणामी,मोकळ्या जागादेखील रासायनिक उद्योगाला देण्यात आल्या. दरम्यान एकाच दिवशी एकाच वेळेस जवळपास पंधराशे एकर जागा शासनाला वर्ग करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने सभा घेऊन ठराव मंजूर करून परिसरात आर्थिक क्रांती येणार या उद्देशाने आपल्या जमिनी आवर्जून दिल्या होत्या. परिणाम प्रत्यक्षात हे उद्योग आल्यावर झाला अन् ग्रामस्थांच्या या प्रयत्नांवर नांगरच फिरला.या रासायनिक प्रकल्पात मोठ मोठ्या उद्योगपतींचे उद्योग आजमितीस मोठ्या दिमाखदारपणे उभे आहेत. राजकीय पाठबळावर त्यांनी एका मागोमाग एक असे अनेक कंपन्या या प्रकल्पात उभ्या केल्या. प्रदूषणाचे कुठलेही नियम नपळता सांडपाणी उघड्यावर सोडले.