शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

रासायनिक प्रकल्पांचा गावांना त्रास,प्रशासकीय, राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:35 IST

रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे.

कुरकुंभ : येथील रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे. परिणामी, त्याचे दुष्परिणाम कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील गावांना सोसावे लागले.मात्र, हा त्रास सहन करत असताना अनेक आमदार, खासदार, मंत्री विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी त्यांचा त्रास फक्त पाहण्यापलीकडे काहीच केले नाही, असेच म्हणावे लागेल. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात अनेक सामान्य कामगारांच जीव गेलेला आहे. मात्र, त्याची गंभीर दखल घेण्यात टाळाटाळ करून आपली आर्थिक पोळी शेकून घेण्यापलीकडे आजपर्यंत काहीच झालेले नाही हे वास्तव आज कुरकुंभ येथे आल्यावर माहीत पडते.कुरभावी पिढीसाठी आपण काहीतरी करीत आहोत. या भावनेतून ज्या लोकांनी हा निर्णय घेतला तो निर्णय कदाचित काही अंशीच खरा ठरला कारण जी स्वप्ने दाखवून हा प्रकल्प उभारला गेला त्याची अवस्थादेखील अन्य प्रकाल्पासारखीच झाली. जमिनी गेल्या व वाट्याला आला तो रासायनिक प्रक्रियेचा घातक दुष्परिणाम, हाताला काम नाही व कसायला जमिनीच उरल्या नाहीत. कारण, प्रदूषणाने परिसरातील जवळपास सर्व जमिनी ह्या बाधित झाल्या त्यामुळे शिकलेल्या मुलांना रोजगार मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची दारे झिजवण्या पलीकडे काहीच हाती आले नाही .या रासायनिक प्रकल्पाच्या उभारणीत साठ टक्के रासायनिक व चाळीस टक्के अन्य उद्योगांना प्राधान्य देण्याचे ठरले मात्र रासायनिक प्रकल्पामुळे अन्य उद्योगांनी या औद्योगिक क्षेत्राकडे पाठ फिरवली. परिणामी,मोकळ्या जागादेखील रासायनिक उद्योगाला देण्यात आल्या. दरम्यान एकाच दिवशी एकाच वेळेस जवळपास पंधराशे एकर जागा शासनाला वर्ग करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने सभा घेऊन ठराव मंजूर करून परिसरात आर्थिक क्रांती येणार या उद्देशाने आपल्या जमिनी आवर्जून दिल्या होत्या. परिणाम प्रत्यक्षात हे उद्योग आल्यावर झाला अन् ग्रामस्थांच्या या प्रयत्नांवर नांगरच फिरला.या रासायनिक प्रकल्पात मोठ मोठ्या उद्योगपतींचे उद्योग आजमितीस मोठ्या दिमाखदारपणे उभे आहेत. राजकीय पाठबळावर त्यांनी एका मागोमाग एक असे अनेक कंपन्या या प्रकल्पात उभ्या केल्या. प्रदूषणाचे कुठलेही नियम नपळता सांडपाणी उघड्यावर सोडले.