शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पैसे देऊनही गावांना पाणी मिळेना

By admin | Updated: April 10, 2017 02:16 IST

जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही

पुणे : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही. नळ कनेक्शनसाठी जादा पैसै घेतले जातात. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जातो. करारानुसार गावांना पाणी दिले जात नाही. त्यामुळे प्राधिकरण विभाग नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत केला. या वेळी भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गावाला जेवढे पाणी मंजूर करते तेवढे पाणी देत नाही. मात्र, पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाते. पाणीटंचाईच्या काळामध्ये गावांचे पाणी तोडू नये, गावांना अतिरिक्त दंड आकारू नये. (प्रतिनिधी)प्राधिकरण करतेय नागरिकांची लूट धरण उशाशी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शिवणे-कोंढवे गटामधील काही गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी दिले आहे. गावाकडून नियमितपणे पाणीपट्टी घेतली जाते. मात्र, पाणीपुरवठा केला जात नाही. नागरिकांना अपुरे व अनियमित पाणी मिळते. नवीन पाणी कनेक्शनसाठी लाखो रुपयांची मागणी केली जाते. प्राधिकरण विभागाचे पाण्याचे दर महापालिकेच्या दरापेक्षा जास्त असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी सांगितले. पाणीपट्टी भरली नाही या कारणामुळे नागरिकांचे पाणी तोडू नये. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय करू नये. शिवसेनेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. -आशा बुचके, गटनेत्या, शिवसेनाजिल्हाधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठकशहरालगतच्या गावांमधील नागरीकरण वाढले आहे. गावामध्ये अनेक मोठ्या सोसायट्या तयार झाल्या आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात या गावांना पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी केलेल्या तक्रारीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पाणीटंचाईच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होईल असे निर्णय घेऊ नये, असेही आदेश दिले आहेत. शहरालगतच्या गावांची पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना दिले. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद केवशनगर या भागामधील नागरीकरण वाढले आहेत. मात्र, त्या प्रमाणात पाणी दिले जात नसल्याची आमची तक्रार आहे. - वंदना कोद्रे, जि़ प़ सदस्या