शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

पैसे देऊनही गावांना पाणी मिळेना

By admin | Updated: April 10, 2017 02:16 IST

जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही

पुणे : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही. नळ कनेक्शनसाठी जादा पैसै घेतले जातात. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जातो. करारानुसार गावांना पाणी दिले जात नाही. त्यामुळे प्राधिकरण विभाग नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत केला. या वेळी भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गावाला जेवढे पाणी मंजूर करते तेवढे पाणी देत नाही. मात्र, पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाते. पाणीटंचाईच्या काळामध्ये गावांचे पाणी तोडू नये, गावांना अतिरिक्त दंड आकारू नये. (प्रतिनिधी)प्राधिकरण करतेय नागरिकांची लूट धरण उशाशी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शिवणे-कोंढवे गटामधील काही गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी दिले आहे. गावाकडून नियमितपणे पाणीपट्टी घेतली जाते. मात्र, पाणीपुरवठा केला जात नाही. नागरिकांना अपुरे व अनियमित पाणी मिळते. नवीन पाणी कनेक्शनसाठी लाखो रुपयांची मागणी केली जाते. प्राधिकरण विभागाचे पाण्याचे दर महापालिकेच्या दरापेक्षा जास्त असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी सांगितले. पाणीपट्टी भरली नाही या कारणामुळे नागरिकांचे पाणी तोडू नये. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय करू नये. शिवसेनेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. -आशा बुचके, गटनेत्या, शिवसेनाजिल्हाधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठकशहरालगतच्या गावांमधील नागरीकरण वाढले आहे. गावामध्ये अनेक मोठ्या सोसायट्या तयार झाल्या आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात या गावांना पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी केलेल्या तक्रारीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पाणीटंचाईच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होईल असे निर्णय घेऊ नये, असेही आदेश दिले आहेत. शहरालगतच्या गावांची पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना दिले. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद केवशनगर या भागामधील नागरीकरण वाढले आहेत. मात्र, त्या प्रमाणात पाणी दिले जात नसल्याची आमची तक्रार आहे. - वंदना कोद्रे, जि़ प़ सदस्या