शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

पैसे देऊनही गावांना पाणी मिळेना

By admin | Updated: April 10, 2017 02:16 IST

जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही

पुणे : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही. नळ कनेक्शनसाठी जादा पैसै घेतले जातात. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जातो. करारानुसार गावांना पाणी दिले जात नाही. त्यामुळे प्राधिकरण विभाग नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत केला. या वेळी भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गावाला जेवढे पाणी मंजूर करते तेवढे पाणी देत नाही. मात्र, पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाते. पाणीटंचाईच्या काळामध्ये गावांचे पाणी तोडू नये, गावांना अतिरिक्त दंड आकारू नये. (प्रतिनिधी)प्राधिकरण करतेय नागरिकांची लूट धरण उशाशी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शिवणे-कोंढवे गटामधील काही गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी दिले आहे. गावाकडून नियमितपणे पाणीपट्टी घेतली जाते. मात्र, पाणीपुरवठा केला जात नाही. नागरिकांना अपुरे व अनियमित पाणी मिळते. नवीन पाणी कनेक्शनसाठी लाखो रुपयांची मागणी केली जाते. प्राधिकरण विभागाचे पाण्याचे दर महापालिकेच्या दरापेक्षा जास्त असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी सांगितले. पाणीपट्टी भरली नाही या कारणामुळे नागरिकांचे पाणी तोडू नये. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय करू नये. शिवसेनेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. -आशा बुचके, गटनेत्या, शिवसेनाजिल्हाधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठकशहरालगतच्या गावांमधील नागरीकरण वाढले आहे. गावामध्ये अनेक मोठ्या सोसायट्या तयार झाल्या आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात या गावांना पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी केलेल्या तक्रारीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पाणीटंचाईच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होईल असे निर्णय घेऊ नये, असेही आदेश दिले आहेत. शहरालगतच्या गावांची पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना दिले. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद केवशनगर या भागामधील नागरीकरण वाढले आहेत. मात्र, त्या प्रमाणात पाणी दिले जात नसल्याची आमची तक्रार आहे. - वंदना कोद्रे, जि़ प़ सदस्या