शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ग्रामस्थांना मिळणार पिण्याचे स्वच्छ पाणी

By admin | Updated: December 24, 2015 00:50 IST

९५ कोटींचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या खात्यात आठवडाभरात वर्ग होणार असून त्यातून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना शासनाने काढल्या आहेत.

पुणे : १४व्या वित्त आयोगातून सुमारे ९५ कोटींचा निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या खात्यात आठवडाभरात वर्ग होणार असून त्यातून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना शासनाने काढल्या आहेत.केंद्र शासनाने वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून १४व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचा गाव-आमचा विकास’ उपक्रम ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील ५ वर्षांचे गावांचे विकास आराखडे तयार करण्यास कळविले आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने गावांचे विकास आराखडे तयार करण्यास सांगितले आहे. ५ जानेवारीपर्यंत कोणती कामे करायची आहेत, ते ग्रामपंचायतीने गटविकास अधिकाऱ्यांना कळवायचे आहे. १५ तारखेपर्यंत गटविकास अधिकारी कोणती कामे बसतात व कोणती नाही, हे ग्रामपंचायतींना कळविणार असून २६ जानेवारीला सर्व ग्रामपंचायतींत ग्रामसभेत गावविकास आराखड्याला मंजुरी घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी संबंधितांना दिले आहेत. २६ जानेवारीनंतर कोणतेही काम हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनेच यात समाविष्ट करण्यात येणार आहे. या निधीतून कोणती कामे घ्यावीत, याचे मार्गदर्शन शासनाने जिल्हा परिषदांना कळविले असून, त्यात प्राधान्याने पाणीपुरवठ्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर गावाची स्वच्छता, ग्रामपंचायत व अंगणवाडीचे बांधकाम, दिवाबत्ती व सौरदिव्यांचा वापर, आवश्यक देखभाल-दुरुस्ती आदी कामे यातून घेतली जाणार आहेत. या निधीतून ९० टक्के निधी हा पायाभूत सुविधा प्रकल्पावर खर्च करण्यात येणार असून, १० टक्के निधी हा प्रशासकीय कामासाठी ठेवायचा आहे. (प्रतिनिधी)पिण्याचे पाणी : पाणीपुरवठा स्रोतांचे बळकटीकर, सोलर पंप बसविणे, आरओ पाणी प्रणाली व इतर प्रकारचे शुद्धीकरण, घरांना पाणीमापक यंत्रे बसविणे, दुर्बल घटकांसाठी पिण्याचा पाणीपुरवठा योजनांचा विस्तार, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी देयके देणे. गाव स्वच्छता : घनकचरा व्यवस्थापन करून खतनिर्मिती करणे, सार्वजनिक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे, डासमुक्त गाव करण्यासाठी शोष खड्डे करणे. २६ जानेवारीपासून या योजनेला सुरूवात होणार असून, गावपातळीवर लोकसंख्या हा निकष आहे. २३६ रुपये प्रतिव्यक्ती अशी रक्कम ग्रामपंचायतींना मिळणार असून, २0११ची लोकसंख्या गृहीत धरली जाईल. -कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद