शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ग्रामस्थांनी रस्ता खोदून केला बंद

By admin | Updated: November 24, 2015 00:52 IST

चार महिन्यापासून उर्से ग्रामपंचायतीजवळच पडलेल्या खडीमुळे येथील १० ते १२ जण जखमी झाल्याने आणि वारंवार

उर्से : चार महिन्यापासून उर्से ग्रामपंचायतीजवळच पडलेल्या खडीमुळे येथील १० ते १२ जण जखमी झाल्याने आणि वारंवार तक्रार करूनही खडी उचलली जात नसल्याने रस्ताच खोदून बंद करण्याची धमकी ग्रामस्थांनी महिन्यापूर्वी दिली होती. तरीही दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी रस्ता जेसीबीच्या साह्याने उकरून बंद केल्याने येथील कंपन्या व ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय झाली आहे.याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध केली होती. चार-पाच महिन्यांपूर्वी महिंद्रा हिनोदय व जयहिंद कंपनीसमोरील रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, कामानंतर येथील मुख्य रस्त्यावर पडलेली दगडी खडी ये-जा करणारे वाहनचालक, दुकानदार, रहिवासी व लहान मुले यांच्यासाठी धोकादायक ठरत होती. कंपनीत कामगारांना नेणारी मोठी गाडी, ट्रक, अती अवजड वाहने या खडीवरून जाताना चाकात अडकून दगड गोफणीतून सुटल्यासारखे उडत होते. त्यामुळे आतापर्यंत दहा ते बारा जणांना मोठी इजा झाली. दुकानांच्या काउंटरच्या काचाही फुटल्या. या ठिकाणी लहान मुलेही खेळत असतात. त्यांनाही दगड लागण्याचा धोका आहे. अपघाती घटना घडत असतानाही ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप होत होता. पडलेली खडी कंपनीने, ग्रामपंचायतीने का रस्ते विकास महामंडळाने उचलायची या वादात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. गावातील वायरमन राजू गायकवाड यांना येथील दगड उडून लागल्याने मोठी जखम डोळ्याला झाली. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील खडी तानाजी कारके यांच्या घरात पाण्यासह वाहून गेल्याने घरात नुकसान झाले. रस्ताच बंद करण्यात आल्याने कंपन्यांची वाहतूक विस्कळीत झाली. (वार्ताहर)