शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिक्षकांसाठी ग्रामस्थांची चूल पेटली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:56 IST

नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

बारामती : तालुक्यातील नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळा बंद राहिली. मंगळवारी (दि.१९) नीरा वागजच्या डोंबाळे मदनेवस्ती परिसरातील घरांमध्ये चूल पेटलीच नाही. उद्या ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत. बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पहिल्याच दिवसापासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांनीही या मागणीला पाठिंबा व्यक्त केला आहे.मंगळवारी गावात चूल पेटलीच नाही. सर्वांनी उपवास धरत निषेध केला. बुधवारी (दि. २०) ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत.मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य अबोली भोसले, नीरा वागजच्या सरपंच मीनाक्षी देवकाते, सदस्य स्वाती देवकाते यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. शिक्षकांच्या बदल्यांबाबत चर्चा केली. या वेळी ग्रामस्थांनी बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी दिला.तसेच, सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले काढून खासगी शाळेत प्रवेशाची तयारी ठेवल्याचे ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, सुधीर देवकाते, पोपटराव देवकाते, सुनील गावडे, सुरेश कोकरे, संग्राम मदने, बाळासाहेब देवकाते, अप्पासाहेब देवकाते आदी पालकांनी या वेळी चर्चेत सहभाग घेतला.गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम या दोघा शिक्षकांनी केलेला शैक्षणिक कायापालट ग्रामस्थांना भावला आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले आहे. दरम्यान, येथे बदली झालेले सुवर्णा आडके, श्रीपाद देशपांडे यांच्यासह इनामदार (पूर्ण नाव माहीत नाही) हे शिक्षक त्यांना रुजू होऊ न दिल्याने दिवसभर झाडाखाली बसून होते.>विद्यार्थ्यांचे नुकसान नकोजिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शिक्षक बदल्यांच्या घोळामुळे, धोरणामुळे राज्यात अनेक शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्याचे नुकसान होत आहे. राज्य शासनाने सर्व अधिकार स्वत:क डे ठेवले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला अधिकार ठेवले नाहीत. बुधवारी (दि २०)होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यावर अवाज उठविणार असल्याचे तावरे म्हणाल्या.