शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शिक्षकांसाठी ग्रामस्थांची चूल पेटली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:56 IST

नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत.

बारामती : तालुक्यातील नीरा वागज परिसरातील ग्रामस्थ शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळा बंद राहिली. मंगळवारी (दि.१९) नीरा वागजच्या डोंबाळे मदनेवस्ती परिसरातील घरांमध्ये चूल पेटलीच नाही. उद्या ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत. बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पहिल्याच दिवसापासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शाळेला टाळे ठोकण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांनीही या मागणीला पाठिंबा व्यक्त केला आहे.मंगळवारी गावात चूल पेटलीच नाही. सर्वांनी उपवास धरत निषेध केला. बुधवारी (दि. २०) ग्रामस्थ थाळीनाद आंदोलन करणार आहेत.मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य अबोली भोसले, नीरा वागजच्या सरपंच मीनाक्षी देवकाते, सदस्य स्वाती देवकाते यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. शिक्षकांच्या बदल्यांबाबत चर्चा केली. या वेळी ग्रामस्थांनी बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी दिला.तसेच, सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले काढून खासगी शाळेत प्रवेशाची तयारी ठेवल्याचे ग्रामस्थांनी या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, सुधीर देवकाते, पोपटराव देवकाते, सुनील गावडे, सुरेश कोकरे, संग्राम मदने, बाळासाहेब देवकाते, अप्पासाहेब देवकाते आदी पालकांनी या वेळी चर्चेत सहभाग घेतला.गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम या दोघा शिक्षकांनी केलेला शैक्षणिक कायापालट ग्रामस्थांना भावला आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले आहे. दरम्यान, येथे बदली झालेले सुवर्णा आडके, श्रीपाद देशपांडे यांच्यासह इनामदार (पूर्ण नाव माहीत नाही) हे शिक्षक त्यांना रुजू होऊ न दिल्याने दिवसभर झाडाखाली बसून होते.>विद्यार्थ्यांचे नुकसान नकोजिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, शिक्षक बदल्यांच्या घोळामुळे, धोरणामुळे राज्यात अनेक शाळा बंद आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. त्याचे नुकसान होत आहे. राज्य शासनाने सर्व अधिकार स्वत:क डे ठेवले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला अधिकार ठेवले नाहीत. बुधवारी (दि २०)होणाºया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यावर अवाज उठविणार असल्याचे तावरे म्हणाल्या.