शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शग्राम निर्मिती अभियानात समितीत विक्रम भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:10 IST

नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली ...

नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महराष्ट्रात ‘डिजिटल ग्रामपंचायत’ असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छ भारत अभियान २०२० च्या आराखड्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यातून आदर्शग्राम निर्मितीसाठी एक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये असणाऱ्या ३४ जिल्हा परिषदमध्ये ३५१ पंचायत समिती आहे. प्रत्येक जिल्हाच्या प्रत्येक तालुक्यात एका आदर्श गावाची (एकूण ३५१ गावे) निर्मिती करण्यात येणार आहे. या आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली असून त्यात कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महाराष्ट्रात 'डिजिटल ग्रामपंचायत' असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे. या २० जणांच्या गटात ग्रामविकासातील अध्यक्ष पोपटराव पवार, पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील, बी. एम. वराळे सत्र संचालक एस. डी. बिराजदार समन्वय, आर. टी. दिघडे, भारत अप्पा पाटील, सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, 'यशदा’चे प्रवीण प्रशिक्षक डॉ. सीमा निकम, जालिंदर काकडे, महेश ढाकणे सरपंच यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण सर्व विभागातून प्रत्येक जिल्हा परिषद मधून २ प्रवीण प्रशिक्षक यांना निमंत्रित केले आहे. त्या प्रवीण प्रशिक्षकांना आदर्श गाव निर्मितीसाठी वरील २० जणांच्या पथकाने मार्गदर्शन व व्याख्यान देणे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात विक्रम भोर यांना ‘डिजिटल ग्रामपंचायत’ व त्याचे अॅप कसे तयार केले. त्याचा वापर कसा होतो याचे प्रशिक्षण देणे कामी दोन्ही बॅचला प्रत्येकी १ तास या वेळेप्रमाणे निमंत्रित केले आहे, असे पत्र यशदा पुणेचे सत्र संचालक तथा प्रकल्प उपसंचालक बी. एम. वराळे यांनी पाठवून निमंत्रित केले आहे.

फोटो : आदर्श ग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी कांदळी गावचे सरपंच विक्रम भोर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.