शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आदर्शग्राम निर्मिती अभियानात समितीत विक्रम भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:10 IST

नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली ...

नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महराष्ट्रात ‘डिजिटल ग्रामपंचायत’ असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छ भारत अभियान २०२० च्या आराखड्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यातून आदर्शग्राम निर्मितीसाठी एक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये असणाऱ्या ३४ जिल्हा परिषदमध्ये ३५१ पंचायत समिती आहे. प्रत्येक जिल्हाच्या प्रत्येक तालुक्यात एका आदर्श गावाची (एकूण ३५१ गावे) निर्मिती करण्यात येणार आहे. या आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली असून त्यात कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महाराष्ट्रात 'डिजिटल ग्रामपंचायत' असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे. या २० जणांच्या गटात ग्रामविकासातील अध्यक्ष पोपटराव पवार, पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील, बी. एम. वराळे सत्र संचालक एस. डी. बिराजदार समन्वय, आर. टी. दिघडे, भारत अप्पा पाटील, सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, 'यशदा’चे प्रवीण प्रशिक्षक डॉ. सीमा निकम, जालिंदर काकडे, महेश ढाकणे सरपंच यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण सर्व विभागातून प्रत्येक जिल्हा परिषद मधून २ प्रवीण प्रशिक्षक यांना निमंत्रित केले आहे. त्या प्रवीण प्रशिक्षकांना आदर्श गाव निर्मितीसाठी वरील २० जणांच्या पथकाने मार्गदर्शन व व्याख्यान देणे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात विक्रम भोर यांना ‘डिजिटल ग्रामपंचायत’ व त्याचे अॅप कसे तयार केले. त्याचा वापर कसा होतो याचे प्रशिक्षण देणे कामी दोन्ही बॅचला प्रत्येकी १ तास या वेळेप्रमाणे निमंत्रित केले आहे, असे पत्र यशदा पुणेचे सत्र संचालक तथा प्रकल्प उपसंचालक बी. एम. वराळे यांनी पाठवून निमंत्रित केले आहे.

फोटो : आदर्श ग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी कांदळी गावचे सरपंच विक्रम भोर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.