शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

आदर्शग्राम निर्मिती अभियानात समितीत विक्रम भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:10 IST

नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली ...

नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महराष्ट्रात ‘डिजिटल ग्रामपंचायत’ असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छ भारत अभियान २०२० च्या आराखड्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यातून आदर्शग्राम निर्मितीसाठी एक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये असणाऱ्या ३४ जिल्हा परिषदमध्ये ३५१ पंचायत समिती आहे. प्रत्येक जिल्हाच्या प्रत्येक तालुक्यात एका आदर्श गावाची (एकूण ३५१ गावे) निर्मिती करण्यात येणार आहे. या आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली असून त्यात कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महाराष्ट्रात 'डिजिटल ग्रामपंचायत' असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे. या २० जणांच्या गटात ग्रामविकासातील अध्यक्ष पोपटराव पवार, पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील, बी. एम. वराळे सत्र संचालक एस. डी. बिराजदार समन्वय, आर. टी. दिघडे, भारत अप्पा पाटील, सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, 'यशदा’चे प्रवीण प्रशिक्षक डॉ. सीमा निकम, जालिंदर काकडे, महेश ढाकणे सरपंच यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण सर्व विभागातून प्रत्येक जिल्हा परिषद मधून २ प्रवीण प्रशिक्षक यांना निमंत्रित केले आहे. त्या प्रवीण प्रशिक्षकांना आदर्श गाव निर्मितीसाठी वरील २० जणांच्या पथकाने मार्गदर्शन व व्याख्यान देणे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात विक्रम भोर यांना ‘डिजिटल ग्रामपंचायत’ व त्याचे अॅप कसे तयार केले. त्याचा वापर कसा होतो याचे प्रशिक्षण देणे कामी दोन्ही बॅचला प्रत्येकी १ तास या वेळेप्रमाणे निमंत्रित केले आहे, असे पत्र यशदा पुणेचे सत्र संचालक तथा प्रकल्प उपसंचालक बी. एम. वराळे यांनी पाठवून निमंत्रित केले आहे.

फोटो : आदर्श ग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी कांदळी गावचे सरपंच विक्रम भोर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.