शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील सतर्कता वाढायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:16 IST

वृद्धा ते अवघ्या ६ वर्षे वयाची बालिकाही नराधमांच्या नजरांना बळी पडतात हे फार क्रूर आहे. महिला आता समाजात पुरुषांच्या ...

वृद्धा ते अवघ्या ६ वर्षे वयाची बालिकाही नराधमांच्या नजरांना बळी पडतात हे फार क्रूर आहे. महिला आता समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, मोकळेपणाने बोलतात, शिक्षण घेतात. पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. कितीतरी फरक पडला आहे, पण स्त्री ही केवळ भोग्य वस्तू या दृष्टिकोनात काही फरक पडलेला नाही. अत्याचार करणारे साध्या फेरीवाल्यापासून रिक्षाचालक ते संभावीत व्हाईट कॉलर असे कोणीही असू शकतात. काही क्रूर समाजकंटक पुरुषी वर्चस्वातून हा दृष्टिकोन बाळगतात, त्यावेळी हा दृष्टिकोन ठेचला कसा जाईल यावर चर्चा व्हायला हवी, असे मला वाटते.

समाजातील संख्येने मोठ्या असलेल्या मध्यमवर्गाला खरे तर असे अत्याचार मान्य नाहीत. अशा समाजकंटकांना ते कधीही थारा देणार नाहीत, या घटना घडूच नयेत यासाठी हा वर्ग बरेच काही करू शकतो. त्याला त्या दृष्टीने सक्रिय करायला हवे असे मला वाटते. अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. अडचणीत आहे अशी शंका आलेल्या कोणाही महिलेला हा वर्ग विचारणा करू शकतो, मदत करू शकतो. खरे तर बस व रेल्वे स्थानके, बसथांबे, निर्जन रस्ते अशा ठिकाणी काही शंकास्पद दिसले तर पोलिस, आरटीओ, सरकारी अधिकारी या घटकांबरोबरच एखाद्या मध्यमवर्गीय नागरिकानेही तेवढेच सतर्क रहायला हवे. त्यामुळे घटना घडण्याआधीच त्याला आळा बसू शकतो.

अशा घटनांमधील पीडित महिलांचे मनोबल वाढवण्याचाही एक मोठा विषय आहे. कायदा पूर्णपणे महिलांच्या बाजूचा आहे. साक्षीदार संरक्षण कायद्यासारखा महत्वाचा कायदा आहे. त्याशिवाय आणखी एका कायद्याविषयी मला सांगायला हवे. राज्य सरकारने शक्ती नावाचा एक कायदा प्रस्तावित केला आहे. येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात त्याला मंजुरी मिळेल. गुन्ह्याची उकल त्वरित होऊन आरोपींना कठोर शिक्षेच्या तरतुदीबरोबरच पीडितेच्या पुनर्वसनाचा विचार यात केला आहे.

अशी सकारात्मकता समाजानेही दाखवायला हवी. ती नाही असे म्हणता येणार नाही. समाजात आजही सकारात्मक विचार करणारे, सहृदयी पुरूष आहेत,पण ते प्रमाण फार कमी आहे. अगदीच नगण्य म्हणता येईल असे. एकूण समाजानेच पीडितेला बळ द्यायला हवे, तिला सन्मान, प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घ्यायला हवी.

समाजाची म्हणून इतकीच जबाबदारी आहे असे नाही. आरोपींना वेगळे पाडणे,त्याचबरोबर अशा प्रवृत्तीचे कोणी दिसले, तर त्यांनाही वेगळे पाडणे असे झाले, तर आपोआपच या नराधम वृत्तीला वचक बसेल. अशा वेळी आवश्यकता असेल तर समविचारी असलेल्या आणखी काही जणांची मदत घेता येईल. सरकारी यंत्रणांना सावध करता येईल. यातही कायद्याची साथ आहे हे मला सांगावेसे वाटते.

दृष्टप्रवृत्ती उघडपणे दिसत नाहीत, पण त्याची चाहूल नक्कीच लागते. त्यावेळीच सतर्क होणे गरजेचे असते. सरकारी यंत्रणा आणि समाजासाठीही ही सतर्कता महत्वाची आहे, असे माझे मत आहे. वानवडीतील प्रकारात एका कार्यालयात घटना घडल्याचे पुढे येत आहे. तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासायला हवे. पाहूनही काही दखल घेतली नाही अशांनाही यात जबाबदार धरायला हवे. त्यांनी सतर्कता दाखवली असती, तर कदाचित पुढचे अत्याचार घडलेही नसते. म्हणून समाजानेच अशा सतर्कतेची सवय लावून घ्यायला हवी.

महिलांची सुरक्षा हा फक्त महिलांचा प्रश्न आहे, अशा संकुचित दृष्टीने त्याकडे पाहणे योग्य नाही. हा एकूणच समाजाचा, सामाजिक सुरक्षेचा, समाजाच्या विवेक, विचारशक्तीचा प्रश्न आहे. आपला भोवताल आपल्यालाच, आपल्यासाठी सुरक्षित करायचा आहे हे प्रत्येक सुजाण नागरिकाने लक्षात घ्यायला हवे. विघ्नहर्त्या श्री गजाननानेच आता समाजाला सतर्क, सावध राहण्याची बुद्धी देवो व नराधम प्रवृत्तींचा नायनाट होवो हीच माझी गणेशचरणी प्रार्थना.

-- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद