शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

आगामी साहित्य संमेलन विदर्भात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 04:51 IST

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. घटनादुरुस्ती समितीची बैठक ३० जूनला, तर साहित्य महामंडळाची बैैठक १ जुलैैला होणार आहे.

पुणे : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. घटनादुरुस्ती समितीची बैठक ३० जूनला, तर साहित्य महामंडळाची बैैठक १ जुलैैला होणार आहे. १ जुलैैच्या बैैठकीत स्थळ निवड समिती आणि मार्गदर्शन समिती गठित होणार आहे. विदर्भ साहित्य संघाकडे साहित्य महामंडळाच्या जबाबदारीचे हे शेवटचे वर्ष असल्याने संमेलन विदर्भात व्हावे, असा सूर साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे महामंडळ असताना सासवड, घुमान आणि ठाणे या ठिकाणी संमेलने आयोजित केली होती. महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे गेल्यानंतर डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलने पार पडली. ८९ व्या संमेलनासाठी सुरुवातीला आपल्या कारकिर्दीतील शेवटचे संमेलन विदर्भातील हिवरे आश्रम हे स्थळ निश्चित करण्यात आले होते. आश्रमाच्या जागेवरुन वाद निर्माण झाल्याने बडोद्याची निवड करण्यात आली. त्यादृष्टीने मार्गदर्शन समिती आणि स्थळ निवड समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महामंडळाच्या कार्यकाळतील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्य रसिकांची अपेक्षा आहे. आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्टाभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.